Uddhav Thackery : सरन्यायाधीशांबद्दल बोलणं भोवणार, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई तक

दिल्लीतील एका पत्रकाराने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्याची परवानगी अॅटर्नी जनरलकडेे मागितली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uddhav Thackeray CJI Chandrachud : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यासाठी एका पत्रकाराने अॅटर्नी जनरलकडे परवानगी मागितली आहे. अॅटर्नी जनरलने परवानगी दिल्यास उद्धव ठाकरेंविरुद्ध अवमानना खटला चालवला जाऊ जाईल. (contempt case against uddhav thackeray)

उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्याबद्दल केलेल्या विधानावर दिल्लीतील पत्रकाराने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बोलताना घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला होता. त्यावरूनच पत्रकार दीपक उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमानना केल्या प्रकरणी ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे.

उपाध्याय यांनी नेमकं काय म्हटलंय?

सुप्रीम कोर्टात अवमानना याचिका दाखल करण्यासाठी पत्रकार दीपक उपाध्याय यांनी अॅटर्नी जनरल वेंकटरामानी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. त्यांनी अॅटर्नी जनरल यांना ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे इंग्रजीत भाषांतरीत करून (English transcription) सादर केले आहेत.

उपाध्याय यांनी त्यात म्हटलं आहे की, “एका राजकारण्याने अत्यंत अपमानास्पद आणि बदनामीकारक विधानं केली आहेत, ज्याचा उद्देश सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे आणि सरन्यायाधीश कार्यालयाला बदनाम करण्याचा आहे. त्यांची ही कृती अवमान करणारी आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp