चीन-पाक सीमेवरही इतका बंदोबस्त पाहिला नाही, मग शेतकऱ्यांसाठी का?
चीन आणि पाकिस्तान सीमेवर मी एवढा बंदोबस्त आत्तापर्यंत पाहिलेला नाही. मग शेतकऱ्यांसाठी एवढा बंदोबस्त का करण्यात आला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. शेतकरी आंदोलन चिघळू द्यायला नको होतं. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि प्रत्येक राज्याप्रमाणे कायद्यात बदल केला गेला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कृषी कायदा गैर नाही, मात्र […]
ADVERTISEMENT

चीन आणि पाकिस्तान सीमेवर मी एवढा बंदोबस्त आत्तापर्यंत पाहिलेला नाही. मग शेतकऱ्यांसाठी एवढा बंदोबस्त का करण्यात आला आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. शेतकरी आंदोलन चिघळू द्यायला नको होतं. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि प्रत्येक राज्याप्रमाणे कायद्यात बदल केला गेला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कृषी कायदा गैर नाही, मात्र त्यातल्या तरतुदींचा फायदा एक-दोघांनाच होता कामा नये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर, सचिन यांना ट्विट करायला सांगणं गैर
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांना कृषी कायद्यांसंदर्भात ट्विट करायला लावणं गैर. ही माणसं खूप मोठी आहेत. हे दोघेही भारतरत्नं आहेत. त्यांचा विचार मोदी सरकारने करायला हवा होता. अक्षय कुमारवर वगैरे आटपून टाकायचं होतं ना प्रकरण… या साध्या माणसांना ट्विट कशाला करायला सांगितलं आता सचिन ट्रोल होतो आहे.. त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
कोण ती बाई रिहाना?