शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवण्यात आली सुरक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली असून बारामतीत दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समजतं आहे.

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आज (26 मे) या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर येत आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी 35 जण या आंदोलनासाठी बारामतीत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास स्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी उजनी संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील उपरी येथे सातारा रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

उजनीच्या पाण्यावरून संघर्ष तीव्र होणार, आंदोलनाची पहिली ठिणगी पंढरपुरात!

ADVERTISEMENT

उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी रद्द झाल्याचे सांगितल्यानंतरही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली होती. जोपर्यंत मुख्यमंत्री सही करून हा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत जिल्हाभर आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या बारामतीतील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने का दिला राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?

उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नेमकं प्रकरण काय आहे?

उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता.

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेला असेल तर मी राजकारण सोडून देईन. असे वारंवार पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

उजनीच्या पाण्यावरुन संघर्ष कायम, इंदापुरात आंदोलनाला सुरुवात

मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्या वेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली.त्यासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्‍नावरून ढवळल्यानंतर उशिरा का होईना, जलसपंदा मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.

राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT