पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातलं ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचं म्हटलं आहे.

‘काँग्रेसचे खुनी इरादे फसले’, PM मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीनंतर स्मृती इराणी संतापल्या

काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पंजाबमधून आपण सुखरूप आलो, जिवावरच्या संकटातून बचावलो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भावना देशाची चिंता वाढवणाऱ्या आहेत. अशा घटना यापुढे घडणार नाहीत याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

विमानतळापर्यंत जिवंत पोहचलो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आभार सांगा; मोदींनी सुनावलं

ADVERTISEMENT

काय आहे संपूर्ण प्रकरण

5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या भटिंडा येथे पोहोचले. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. पण अपुरा प्रकाश आणि पावसामुळे पीएम मोदी यांना तब्बल 20 मिनिटं वाट पाहावी लागली. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने त्यांना तब्बल 2 तास लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रस्त्याने गेले.

पंतप्रधान मोदींचा ताफा हा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापूर्वी सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी इथे रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

काय आहे नाना पटोले यांचं म्हणणं?

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी त्रुटी राहिली त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तर या घटनेमागे हात नाही ना? असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT