मलिक-देशमुखांना मतदान नाकारलं, सरळ सोप्प्या भाषेत समजून घ्या सहावा उमेदवार राज्यसभेवर कसा निवडून जाणार
मुंबई: महाराष्ट्रात तब्बल 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराचं मत हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. अशातच सत्र न्यायालयाने ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीचं चित्र पुन्हा एकदा […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात तब्बल 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराचं मत हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. अशातच सत्र न्यायालयाने ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीचं चित्र पुन्हा एकदा बदललं आहे.
खरं म्हणजे राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसारखी सरळ सोप्पी नाहीए. ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट आहे. त्यातच या घडीला महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली आहे. अशावेळी राज्यसभेवर सहावा उमेदवार नेमका कसा निवडून जाणार हे आता आम्ही आपल्याला अगदी सरळ आणि सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.
राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सरळ आणि सोप्प्या भाषेत
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार निवडून जातात. त्यामुळे राज्यसभेसाठी विधानसभेचे आमदारच मतदान करु शकतात. सध्याच्या स्थितीत विधानसभेत 287 आमदारच आहेत. कारण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं असून त्यांची जागी रिक्त आहे. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मतदानाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशावेळी आता राज्यसभा निवडणुकीसाठी फक्त 285 आमदारच मतदान करणार आहेत.