आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना भावनिक पत्र : विकासाकामांमुळे विरोधकांनीही घेतला आहे इंटरेस्ट

मुंबई तक

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला आज 3 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी यापूर्वी झालेल्या विकासकामाचा आढावा घेतला. तसंच भविष्यातही एकत्र राहण्याचं आणि विकासकाम करत राहण्याचं आश्वासन दिलं. काय आहे आदित्य ठाकरे यांच्या पत्रात? प्रिय वरळीकरांनो, महाराष्ट्र विधानसभेमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला आज 3 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी यापूर्वी झालेल्या विकासकामाचा आढावा घेतला. तसंच भविष्यातही एकत्र राहण्याचं आणि विकासकाम करत राहण्याचं आश्वासन दिलं.

काय आहे आदित्य ठाकरे यांच्या पत्रात?

प्रिय वरळीकरांनो,

महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+’ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत.

हे वाचलं का?