Maratha Morcha: ‘ते कर्तबगार गृहमंत्री होते..’ शरद पवारांनी ‘असे’ टोचले देवेंद्र फडणवीसांचे कान

रोहित गोळे

ADVERTISEMENT

ncp chief sharad pawar taunts dcm devendra fadnavis over resignation after baton attack on jalna maratha morcha protesters maharashtra politics news marathi
ncp chief sharad pawar taunts dcm devendra fadnavis over resignation after baton attack on jalna maratha morcha protesters maharashtra politics news marathi
social share
google news

Maratha Morcha and Sharad Pawar vs Devendra Fadnavis: जालना: गोवारी हत्याकांड झालं तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जालना मराठा मोर्चावर (Maratha Morcha) झालेल्या लाठीहल्ल्याबाबत (Lathihalla) प्रतिक्रिया देताना केलं होतं. ज्यानंतर आज (2 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालनातील पत्रकार परिषदेत बोलताना याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले आहे. (ncp chief sharad pawar taunts dcm devendra fadnavis over resignation after baton attack on jalna maratha morcha protesters maharashtra politics news marathi)

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे काल (1 सप्टेंबर) रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तुफान लाठीहल्ला चढवला होता. ज्यानंतर शरद पवार यांनी आज तात्काळ तिथे जाऊन आंदोलक आणि जखमींची भेट घेतली. याच भेटीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दातून टीका केली. तसंच राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन देखील सुनावलं.

शरद पवारांनी बोचऱ्या शब्दात फडणवीसांना सुनावलं…

‘मी जखमी लोकांना भेटलो आणि आंदोलकांना भेटलो.. ते सतत एक गोष्ट सांगत होते की, आमचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण वरून आदेश आला. फोन आला कोणाचा तरी आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला.. आता हा कोणाचा फोन आला ते आंदोलकांना माहीत नव्हतं. पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांसंबंधी घोषणा देत होते. पण त्यासंबंधीची खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय…’, उद्धव ठाकरेंची जीभ घसरली

‘एक शंका अशी आहे लोकांना की, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे संपूर्ण (मुंबईतील INDIA बैठकीबाबत) देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. ते कुठे तरी विचलित करावं त्यासाठी असा काय उद्योग केला की काय? अशी शंका काही लोकांच्या मनात आहे. पण त्याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही.’

‘आम्ही लोकं सत्तेत होते.. आम्ही आरक्षणाबाबत निर्णय घेतला पण तो निर्णय कोर्टाने टिकवला नाही याचा दोष मला सहकाऱ्यांना देता येणार नाही.’

ADVERTISEMENT

‘ज्यांचा (देवेंद्र फडणवीस) उल्लेख तुम्ही केला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की, मी मुख्यमंत्री असताना.. ते 28 वर्षांपूर्वीची गोष्ट ते सांगतात. की, त्यावेळी नागपूरला एक आंदोलन झालं गोवारींचं.. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये काही लोकांना प्राण गमवावा लागला होता.’

‘पण त्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यावेळी पवार साहेबांनी राजीनामा का नाही दिला? आता यात दोन गोष्टी होत्या.’

‘ज्यावेळी गोवारींचा प्रसंग झाला तेव्हा मी नागपुरात नव्हतो. तर मुंबईत होतो. दुसरी गोष्ट अशी की, हा प्रकार झाल्यानंतर माझ्या सरकारमधील आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला. का दिला? तर हा आदिवासींशी संबंधित मुद्दा होता. त्यांनी माझी परवानगी देखील घेतली नाही. त्यांनी सांगितलं की, या गोष्टी घडल्या आहेत. त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. म्हणून मी राजीनामा मी देतो. तो राजीनामा मी स्वीकारला.’

‘ज्यांनी मला प्रश्न विचारला.. तेच आज गृहखात्याचे मंत्री आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी कोणाची आहे? ज्याची असेल त्यांनी मधुकर पिचडांचा आणि गोवारीच्या काळातील सरकारचं स्मरण केलं तर मला वाटतं त्यांना स्वत:ला प्रशासन कसं चालवावं याची माहिती मिळते.’

हे ही वाचा >> Maratha Morcha: शरद पवार पोहचले जालन्याला, मराठा आंदोलकांना म्हणाले; ‘जे करायचं ते…’

‘आज एवढा मोठा प्रकार होतो… ज्याचे परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातील होतील हे स्वच्छ दिसतंय.. अशावेळी जबाबदारी ज्याची असेल त्याने जबाबदारी घ्यायची असते. अगदी साधी गोष्ट आहे.. आर. आर पाटील हे मंत्री होते. असाच प्रकार मुंबईत झाला. तेव्हा ते मीडियासमोर मांडताना त्यांच्याकडून काही कमतरता राहिली. त्या कारणवारुन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता. ते कर्तबगार गृहमंत्री होते आणि हा आदर्श महाराष्ट्राचा आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT