Bihar Political Crisis : राजकीय भूकंप! नितीश कुमारांनी दिला राजीनामा, कारणही सांगितले
नितीश कुमार रविवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास नितीश कुमार हे बिहारचे राज्यपाल जाखड यांच्या भेटीला गेले. राजभवनात पोहोचल्यावर त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.
ADVERTISEMENT

Nitish Kumar Resigns News, Bihar Crisis LIVE Updates in Marathi : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शक्यता खऱ्या ठरल्या. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. भाजप आमदारांच्या समर्थानाचं पत्र घेऊन नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
नितीश कुमार रविवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास नितीश कुमार हे बिहारचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांच्या भेटीला गेले. राजभवनात पोहोचल्यावर त्यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.
हेही वाचा >> अमित शाहांची भेट अन् 50 दिवसांत असं बदललं बिहारचं राजकारण, Inside Story
राजीनामा का दिला? नितीश कुमार म्हणाले…
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार म्हणाले की, “मी काम करत होतो, पण मला काम करू दिले जात नव्हते. त्यामुळे लोक दु:खी होत होते. आज मी राजीनामा सोपवला आहे. आमच्या लोकांचे, पक्षाचे मत ऐकून घेतले आणि म्हणून आज मी राजीनामा देऊन तेथील सरकार बर्खास्त केली. ज्या पद्धतीने ते लोक दावा करत होते ते आमच्या लोकांना वाईट वाटत होते. आज इतर पक्ष जे आधी एकत्र होते, ते ठरवतील. पुढे काय होते ते पाहूया.”
#WATCH पटना: JDU अध्यक्ष नीतीश कुमार ने कहा, “आज मैंने मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे दिया है और मैंने राज्यपाल से राज्य में सरकार को समाप्त करने के लिए भी कहा है…” pic.twitter.com/ta3r6FUxqp
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2024