राज्यसभा निवडणूक: ‘आम्ही बरेच प्रयत्न केले, फडणवीसांच्या घरीही गेलो पण…’, राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई तक

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कोणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानीही गेले होते. पण तरीही या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कोणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानीही गेले होते. पण तरीही या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लागलीच माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली. घोडेबाजार रोखण्याच मविआने प्रयत्न केला. पण भाजप उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. पण या निवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘आता वेळ सुरु झालेली आहे. आता चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण एकमेकांच्या सहमतीने ही निवडणूक लढवावी. कोणत्याही पद्धतीने घोडेबाजाराला वाव राहू नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp