Sharad Pawar Kolhapur: मोदी सरकारमध्ये आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याचीही… : पवार
Sharad Pawar Kolhapur Sabha: मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. महिलांची अब्रू राखता न येणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून न देण्याचं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Kolhapur Sabha Attack on Modi Govt: कोल्हापूर: ‘आया-बहिणींची इज्जत सांभाळण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही त्या सरकारला सत्तेवर बसायचा अधिकार नाही.’ अशा अत्यंत जहाल शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली आहे. ते कोल्हापूर येथील ‘स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार’ सभेत बोलत होते. (sharad pawar harsh criticism said modi government which does not have the power to protect the dignity of women has no right to come to power maharashtra politics news marathi)
यावेळी शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका केली. ही टीका त्यांनी शेती, रोजगार यासह महिलांच्या सुरक्षेविषयीच्या मुद्द्यावर देखील केली. पाहा यावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले.
शरद पवारांची मोदी सरकारवर तुफान टीका
‘कालच्या पेपरमध्ये एक महत्त्वाची बातमी आली.. कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचं पीक घेणारा जिल्हा आहे.. इथे साखर तयार होते, गूळ तयार होतो. केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे की, साखर परदेशात जाते तिच्यावर काही तरी बंधनं घालावी. सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर निर्यात करायला परवानगी दिली ती सप्टेंबर महिना झाल्यानंतर साखर परदेशात निर्यात करता येणार नाही.’
‘जर साखर तयार करून आपण परदेशात नेऊ शकलो नाही तर त्या साखरेची किंमत मिळणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत ही मिळणार नाही. त्याची जबरदस्त किंमत ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना सुद्धा द्यावी लागेल.’