Sharad Pawar Interview: अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी

साहिल जोशी

Sharad Pawar Mumbai Tak Interview: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर शरद पवारांच्या नेमक्या भावना काय?, वाचा मुंबई Tak वरील शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

ADVERTISEMENT

sharad pawar mumbai tak exclusive interview after ajit pawar rebelled ncp
sharad pawar mumbai tak exclusive interview after ajit pawar rebelled ncp
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय अंमलात आणल्याने पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर अजित पवारांनी लागलीच शरद पवारांवर (Sharad Pawar) टीकाही केली, त्यांच्यासोबतच्या अनेकांनी तशाच स्वरुपाचं भाष्य केलं. मात्र, या सगळ्यात आपण मागे हटणार नाही. महाराष्ट्र पिंजून काढू अन् पक्षाला नवी ताकद देऊ असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पण असं असताना वयाच्या 83 व्या वर्षी त्यांच्यासमोर प्रचंड आव्हानं आहेत. त्या आव्हानांना पवार कसं तोंड देणार.. आपल्या विरोधकांवर कशी मात करणार या सगळ्याबाबत स्वत: शरद पवार यांनी अतिशय रोखठोकपणे उत्तरं दिली आहेत. (sharad pawar mumbai tak exclusive interview after ajit pawar rebelled ncp sahil joshi latest political news maharashtra)

मुंबई Tak चे (Mumbai Tak) व्यवस्थापकीय संपादक साहिल जोशी (Sahil Joshi) यांनी आज (8 जुलै) शरद पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांनी अजित पवारांपासून भुजबळ आणि प्रफुल पटेलांचा चांगलाच समाचार घेतला. वाचा शरद पवार यांची हीच एक्सक्लुझिव्ह मुलाखत जशीच्या तशी..

शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी:

साहिल जोशी: छगन भुजबळांच्या मतदारसंघातून तुमची यात्रा सुरू होणार आहे. तुम्ही लोकांना काय सांगणार आहात?

शरद पवार: मी नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. येवला हा नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. नाशिक जिल्ह्याची ही खासियत आहे की, हा जिल्हा काँग्रेस विचाराचं समर्थन करणारा जिल्हा आहे. एकेकाळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं अधिवेशन देखील झालं होतं. जेव्हा पंडीत जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात घेतलं तेव्हा याच नाशिक जिल्ह्याने चव्हाण साहेबांना बिनविरोध संसदेत पाठवलं. यामुळेच हा एक वेगळा जिल्हा आहे जिथे आमचं भावनिक नातं आहे.

एकदा असंच झालं की, माझ्या नेतृत्वात माझ पक्ष लढत होता. सगळ्याविरोधात.. किंबहुना काँग्रेसविरोधातही.. तेव्हा नाशिक जिल्ह्याने मला सर्व जागा माझ्या पारड्यात टाकल्या होत्या. त्यामुळे मला आनंद वाटतो की, हा एक असा जिल्हा आहे की, चांगल्या कामासाठी नेहमीच समर्थन देतं. यामुळे नाशिक जिल्ह्यात आपण जायला हवं, कोणत्या तरी मतदारसंघात जायला हवं.. त्यासाठी मी हा मतदारसंघ निवडला. हा जो मतदारसंघ आहे तिथे भुजबळ आमदार आहेत. पण भुजबळ हे नाशिकच्या राजकारणात येण्याआधी येवला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस एस ज्याचा मी अध्यक्ष होतो.. तो आमच्याकडे होता. साहजिकच आम्हाला समर्थन देणारा हा मतदारसंघ आहे.

जेव्हा भुजबळ साहेब मुंबईतून निवडून जाऊ शकत नव्हते.. त्यांच्यासाठी स्थिती योग्य नव्हती तेव्हा आम्ही ठरवलं की, त्यांच्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ आपण कुठून देऊ शकतो.. तर तो सुरक्षित मतदारसंघ हा येवला आहे. पक्षाने त्यांना हा मतदारसंघ दिला आणि त्यांनी देखील हाच मतदारसंघ मागितला होता. तिथून ते निवडूनही आले.

आज मी सुरुवात यासाठी करत आहे की, जेव्हा एक समस्या निर्माण होते राजकीय.. तेव्हा असे मतदारसंघ जे तुम्हाला समर्थन देतात ज्यामध्ये येवला आहे.. त्यामुळे आम्ही येवल्यापासून सुरुवात करत आहोत.

साहिल जोशी: आज आपल्यावर सर्वाधिक हल्ला कोण चढवत असेल तर ते छगन भुजबळ आहेत. ते म्हणतात आपण जे पेरलं आहे तेच आता उगवतंय.. आपण अनेकदा यू-टर्न घेतले आहेत राजकारणात त्यामुळे आज आपल्याला हे पाहावं लागतंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp