भारतात सर्व यंत्रणा अलर्टवर, एअर इंडियानं रद्द केली अनेक उड्डाणं... वाचा सविस्तर माहिती

मुंबई तक

Operation Sindoor Updates: भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून श्रीनगर विमानतळ सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलं अशी माहिती आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताचा पाकिस्तावर घरात घुसून हल्ला

point

पहलगाम हल्ल्यानंतर दशतवाद्यांच्या विरोधात थोपटले दंड

Latest Updates on Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी रात्री उशिरा दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर, खबरदारी म्हणून श्रीनगर विमानतळ सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलं आहे. तसंच, एअर इंडियाने जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, चंदीगड आणि पंजाबला जाणारी अनेक उड्डाणं दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द केली आहेत.

हे ही वाचा >> मध्यरात्रीच हादरवून टाकलं... पाकिस्तानच्या 'या' 9 ठिकाणी भारताचा अचूक हल्ला, नेमका कुठे-कुठे केला Air Strike?

श्रीनगर विमानतळ बंद, कुठेकुठे फ्लाईट रद्द?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून श्रीनगर विमानतळ सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही सैन्याने संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले आहे.

दुपारी 12 वाजेपर्यंत अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने एक सल्लागार जारी केला आहे की, 'सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडियाने पुढील आदेश येईपर्यंत 7 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

हे ही वाचा >> रात्री दीडची वेळ, पाच ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला... पाकच्या पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं?

कंपनीने म्हटलं आहे की, अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणं दिल्लीकडे वळवण्यात आली आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp