अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, केली मोठी मागणी…
Ajit Pawar Letter: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून खारघर दुर्घटनेप्रकरणी निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता अजित पवारांनी राज्यपालांना नेमकं कशासंबंधी पत्र लिहलंय आणि त्यांनी नेमकी कोणत्या मुद्द्यावर मागणी केली आहे हेच आपण सविस्तर जाणून घेऊया. (ajit pawar has written letter to governor Ramesh Bais demanding an inquiry into the Kharghar tragedy by a retired judge)
16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळा आयोजित करण्यात आला होता. जेथे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकार यांना पुरस्कार प्रदान करणयात आला. पण यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या 14 जणांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी आता असा आरोप केला आहे की, 14 जणांचा मृत्यू हा उष्माघाताने नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाला आहे.
याच प्रकरणी अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून ही घटना गंभीर असून त्याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.
पाहा अजित पवार यांनी राज्यपाल बैस यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय:
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा दि. १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. मी स्वतः घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची, रुग्णांच्या नातेवाईकांची व डॉक्टरांची भेट घेतली. तसेच, अन्य मागण्यांसह या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी, अशी मागणी लेखी पत्राव्दारे सरकारकडे केली आहे. या पत्राची प्रतही सोबत जोडली आहे.










