"त्यावेळेस दोनदा मरता-मरता वाचलो", धनंजय मुंडे असं का म्हणाले?

मुंबई तक

Diwali 2025 Celebration: दिवाळी हा तो दिवस आहे जेव्हा देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येऊन तिच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करते. दिवाळीच्या रात्री काही विधी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: "ज्या घटनेशी माझा काही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता-मरता वाचलो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे," अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आपली खंत व्यक्त केली.

परळी तालुक्यातील बोधेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मागील काही दिवसात कसा त्रास झाला हे सांगितलं. 

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

आपल्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले, "त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्याचे थोडे बाकी आहे. पण मी जन्माला आलो तोच लोकांची सेवा करायला, म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही."

हे ही वाचा>> 'CM फडणवीसांनी मुंडेंना स्वत: जाऊन सांगितलं आता राजीनामा द्या', सुरेश धसांनीच सांगितली Inside स्टोरी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, "या निवडणुकीत मायबाप जनतेने मला 1 लाख 42 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मते घ्यायला महाराष्ट्रात आपण एक नंबरला आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही. मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही. जी संकटं आली, ती अचानक आलेली संकटं होती आणि घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण असते," असं म्हणत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

हे वाचलं का?

    follow whatsapp