अजित पवारांना मुख्यमंत्रिपदानं किती वेळा हुलकावणी दिली आहे?

मुंबई तक

Ajit Pawar and Post of Chief Minister: जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना आतापर्यंत किती वेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

ADVERTISEMENT

how many times post of chief minister dodge the ajit pawar
how many times post of chief minister dodge the ajit pawar
social share
google news

Chief Minister Post: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीच्या बातम्या आणि बंड यात काही नवीन नाही. राज्यात 4 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अजित पवारांची मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. मात्र, अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले अजितदादा मुख्यमंत्री पदापासून कसे दूर राहिले, वेळोवेळी अजितदादांची नाराजी कशी समोर आली याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (how many times post of chief minister dodge the ajit pawar)

आतापर्यंत किती वेळा अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाने दिलीए हुलकावणी?

अजित पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात एंट्री घेतली. 1999 मध्ये ते पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले. तेव्हा त्यांना पाटबंधारे आणि फलोत्पादन ही खाती मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये अजितदादांची पहिली नाराजी समोर आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. तरीही शरद पवारांनी काँग्रेसशी बोलणी करुन त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्याच्या बदल्यात पवारांनी 2 कॅबिनेट पदं आणि अतिरिक्त राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतली.

त्यावेळी अजितदादांना जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्यांवर समाधान मानावं लागलं होतं. तेव्हा अजितदादा म्हणाले होते की, 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती.

अजित पवार यांची महत्वाकांक्षा पुन्हा 2008 साली समोर आली. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदी अजितदादांना वगळून छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर 2010 मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि भुजबळांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. मात्र, या पदासाठी शरद पवारांची पहिली पसंती अजित पवार नसून दुसराच नेता असल्याचं स्पष्ट झाल्यानं ही सल अजितदादांच्या मनात कायम राहिली असेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp