Govindgiri: ‘मी मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केली नाही, फक्त..’, गोविंदगिरी महाराजांचा यू-टर्न

रोहित गोळे

ADVERTISEMENT

i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement
i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement
social share
google news

Ayodhya Ram Mandir Inauguration Govindgiri Maharaj: अयोध्या: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा काल (22 जानेवारी) अत्यंत जल्लोषात पार पडला. याच सोहळ्यानंतर झालेल्या भाषणात गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. याच टीकेनंतर गोविंदगिरी महाराज यांनी स्पष्टीकरण दिलं असून आता असं म्हटलं की, मी शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली नाही. (i didnt compare pm modi with shivaji maharaj govindgiri maharaj u turns on yesterday statement)

‘मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केलीच नाही, फक्त…’

शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान मोदींची तुलना केल्यानंतर गोविंदगिरी महाराज यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा नेमकं गोविंदगिरी महाराज नेमकं काय म्हणाले…

हे ही वाचा>> Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य

माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाशीही करणार नाही. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ वाटतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं याचा अर्थ अन्य कुणाला त्यांच्यासारखं समजणं असा होत नसतो.

फक्त शिवाजी महाराजांच्या काही गुणांचं अनुसरण हे काही नेते करत आहेत. तशा प्रकारच्या गुणांचं अनुसरण करणारे नेते आपले जे काही आहेत त्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान सुद्धा आहेत. हे सांगायला मला कुठल्याही प्रकारचा संकोच मला तेव्हाही वाटला नाही आणि आताही वाटत नाही.

असं म्हणत गोविंदगिरी महाराज यांनी त्यांच्या कालच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ram Mandir : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान’, रोहित पवार गोविंदगिरी महाराजांवर भडकले

PM मोदींसमोर गोविंदगिरी म्हणाले की, “आपल्याला आज ‘श्रीमंत योगी’ मिळालाय..”

वाचा कालच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर गोविंद गिरी नेमकं काय म्हणाले होते.

जेव्हा ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो म्हणजे तप.. पण आज तप कमी झालं आहे.. पण ते तप आपण साकार करत आहात. ही परंपरा पाहता मला फक्त एक राजा लक्षात येतो.. ज्याच्यामध्ये हे सगळं होतं. तो राजा म्हणजे.. छत्रपती शिवाजी महाराज!

लोकांना माहिती नाही की, ते स्वत: जेव्हा मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी तेव्हा असं म्हटलं की, मला राज्य करायचं नाही.. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आरधनेसाठी जन्म घेतलाय. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत घेऊन जाऊ नका.

इतिहासातील तो विलक्षण प्रसंग आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजवलं की, आणि त्यांना परत आणलं. त्यांना सांगितलं की, तुमचं हे कार्य देखील भगवत सेवाच आहे.

आज आपल्याला देखील तशाच स्वरूपाचे महापुरुष प्राप्त झाले आहेत. ज्यांना भगवती जगदंबेने स्वत: हिमालयातून परत पाठवलं की, जा भारत मातेची सेवा कर. तुला भारतमातेची सेवा करायची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामींची आठवण आली. त्यांनी शिवाजींचं वर्णनं केलं की, ‘निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारू.. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी..’ आपल्याला आज श्रीमंत योगी प्राप्त झालाय..

असं विधान गोविंदगिरी महाराज यांनी विधान केलं होतं. पण आता आपण छत्रपतींची मोदींसोबत तुलना केली नसल्याचं गोविंदगिरी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT