Nawab Malik : अजित पवार गटाने मलिकांना केले दूर; जितेंद्र आव्हाड-रोहित पवार म्हणाले…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Nawab Malik issue heats up politics of maharashtra. rohit pawar and jitendra awhad slams sunil tatkare
Nawab Malik issue heats up politics of maharashtra. rohit pawar and jitendra awhad slams sunil tatkare
social share
google news

Rohit Pawar Jitendra Awhad on Nawab Malik : नवाब मलिकांच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण झालीये, तर अजित पवार गटही सावध झाला आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे अजित पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले. पण, विरोधकांकडून टीका सुरू होताच अजित पवार गटाने त्यांना दूर केल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी तसेच संकेत दिले आहेत. पण, यावरून शरद पवारांसोबत असलेले जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी उरोधिक भाषेत खडेबोल सुनावले. (Rohit Pawar and Jitendra Awhad tweets on Nawab Malik)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. पण, यामुळे भाजपवर टीका सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना भाजपनेच मलिकांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली. विरोधकांनी भाजपला घेरताच अजित पवार गटाने सावध भूमिका घेत मलिकांना दूर केले.

मलिक अजित पवार गटासोबत नाही?

“आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटले आहे. मलिकांची भेट झाली, पण त्यांच्याशी राजकीय चर्चा केली नाही, असे सांगत तटकरेंनी मलिक अजित पवार गटात नाहीत, अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘सत्ता येते आणि जाते, पण…’, फडणवीसांचं अजितदादांना खुलं पत्र, महाराष्ट्रात मोठी खळबळ!

“मित्र मंडळ, गुवाहाटी मंडळ”, रोहित पवारांनी काय म्हटलंय?

या प्रकरणावर रोहित पवारांनी भाष्य करताना अजित पवार गट आणि शिंदेंच्या सेनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांच्याबाबत भाजप नेत्यांनी आधी खोटे आरोप करून रान उठवलं आणि आज सकाळी त्यांना सभागृहात नवाब मलिक साहेब यांचाच बचाव करावा लागला. परंतु यामुळं टीका होऊ लागताच लगेच पत्रप्रपंच करून स्वतःची प्रतिमा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु झालाय.”

ADVERTISEMENT

पवारांचा भाजपवर ‘बाण’

“यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राज्यात सर्वाधिक गोंधळलेला आणि भूमिकाहीन पक्ष म्हणजे भाजपा आहे.. म्हणूनच त्यांच्या नेत्यांना त्यांच्याच भूमिकांचा विसर पडतोय.. भाजपची ना कुठली ठोस भूमिका, ना कुठली विचारधारा… यांची भूमिका एकच, ती म्हणजे केवळ आणि केवळ सत्ता”, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाही”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचे गांधी कुटुंबाबद्दल गौप्यस्फोट

“असो! ‘मित्र मंडळ’ स्वायत्त नसल्याची बाब या पत्राच्या निमित्ताने स्पष्ट झाली आणि ‘गुवाहाटी मंडळा’बाबत तर न बोललेलंच बरं!”, असा उपरोधिक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

ते म्हणायची आमच्यात हिंमत, आव्हाडांनी तटकरेंना काय सुनावलं?

“एवढे जुने सहकारी असूनदेखील तुम्ही हे बोलू शकत नाही आहात की, राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरणात नवाब मलिक यांना अडकवलं गेलंय आणि तेही त्यांच्याकडून ज्यांच्या मांडीला मांडू लावून आता तुम्ही सरकारमध्ये बसलायत. आमच्यादृष्टीने नवाब मलिक निर्दोष आहेत आणि हे म्हणायची आमच्यात हिंमत आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

मलिकांवरून राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. 18 महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर मलिकांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाविरोधात विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT