शिंदे, फडणवीस, पवारांमध्ये खलबतं! रात्री 2 वाजेपर्यंत बैठक कशासाठी?
वर्षा बंगल्यावर तब्बल तीन तास ही बैठक चालली. रात्री (10 जुलै) 11 वाजून 12 मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले. ते मध्यरात्री (11 जुलै) 2 वाजून 9 मिनिटांनी बाहेर पडले.
ADVERTISEMENT

Politics of Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री (10 जुलै) उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने काही मुद्द्यांवरून मोठा पेच निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. (Eknath Shind, Ajit Pawar, Devendra Fadnavis meeting on Maharashtra Cabinet Portfolio Allocation)
अजित पवार यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला असून, बिनखात्याचे मंत्री आहेत. खातेवाटपावरून घोडं अडलं असून, अजित पवार गटाकडून काही महत्त्वाची खाती मागण्यात आलेली आहेत. अर्थ व नियोजन खातं अजित पवारांना देण्यास एकनाथ शिंदेंच्या आमदारांचा विरोध आहे. त्यामुळेच यावरून धुसपूस दिसत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर बैठक
दरम्यान, 17 जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी खातेवाटप करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसांत खातेवाटप होण्याची सांगितलं जात असतानाच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक झाली.
वाचा >> BJP: उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी सुनावलं, म्हणाले; जरा तुमची भाषा…
वर्षा बंगल्यावर तब्बल तीन तास ही बैठक चालली. रात्री (10 जुलै) 11 वाजून 12 मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले. ते मध्यरात्री (11 जुलै) 2 वाजून 9 मिनिटांनी बाहेर पडले. या बैठकीसाठी अजित पवार हे 12.03 वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. पण, देवेंद्र फडणवीसांच्या आधीच म्हणजे 1 वाजून 26 मिनिटांनी बाहेर पडले.