'बोलता येणार नाही, शेवटचं बोलतोय', मनोज जरांगेंनी समाजाला काय सांगितलं?
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत समाजाला आवाहन करत गाफील न राहण्याचा इशारा दिला. अंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने पोहोचण्याचं आवाहन करत त्यांनी सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'बोलता येणार नाही, शेवटचं बोलतोय',
मनोज जरांगेंनी समाजाला काय सांगितलं?
Manoj Jarange Patil, जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आता आरपारच्या लढाईचा एल्गार केला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव ट्रॅक्टर, रिक्षा आणि विविध वाहनांनी अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. सरकारने 58 लाख नोंदी दिल्या असल्याचा दावा होत असताना, त्यानंतरही जात पडताळणी प्रक्रिया होत नसल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणाच्या मागण्या, कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रांची पडताळणी आणि सरकारची भूमिका यावरून त्यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाचं खोटं अकाउंट बनवलं, पतीला अश्लील व्हिडिओ पाठवले
"उद्यापासून मला बोलता येणार नाही, म्हणून आज सगळं सांगतोय”
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हे शेवटचं आंदोलन असल्याचं सांगत समाजाला सतर्क राहण्याचं आवाहन केलं. “उद्यापासून मला बोलता येणार नाही, म्हणून आज सगळं सांगतोय,” असं म्हणत त्यांनी समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी आपण जीवाची बाजी लावत असल्याचं स्पष्ट केलं. अन्न-पाण्याविना आंदोलन करत असल्याचं सांगताना त्यांनी समाजाने गाफील राहू नये, कोणाच्याही बोलण्यावरून आपापसांत दुही निर्माण करून घेऊ नये आणि विजयाच्या वेळी मागे हटू नये, असं आवाहन केलं. तीन वर्षांच्या अखंड लढ्यानंतर आता विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा करत त्यांनी मराठा समाजाने ताकद दाखवण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं.
हेही वाचा : Govt Jobs : युको बँकेत नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार; लगेच करा अर्ज
