Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?

मुंबई तक

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.या बैठकीतून काय तोडगा निघतोय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी मराठा आरक्षणाचा संपूर्ण लढा काय आहे? तो जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गेल्या 14 दिवसापासून मनोज जरांगे पाटील जालन्यात उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले होते. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अखेर या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.या बैठकीतून काय तोडगा निघतोय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी मराठा आरक्षणाचा संपूर्ण लढा काय आहे? तो जाणून घेऊयात. (maratha reservation jarange patil agitation obc reservation eknath shinde devendra fadnavis)

मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून जालन्याच्या अंतरावली सराटी गावात उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. अनेक मराठा संघटनांनी टायर, गाड्या जाळून या घटनेचा निषेध केला होता. यासोबत अनेक मराठा संघटनांनी जरांगेच्या समर्थन देण्यासाठी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आंदोलन सूरू केले होते.

कोण आहेत मराठा?

सप्टेंबर 1948 मध्ये निजाम राजवट संपेपर्यंत मराठ्यांना कुणबी मानले जात होते आणि ते ओबीसी होते. त्यामुळे आता त्यांना कुणबी जातीचा दर्जा देऊन ओबीसीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी आहे.कुणबी हा शेती करणारा समुदाय आहे. कुणबी जातीच्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळते. महाराष्ट्राचा भाग होण्यापूर्वी मराठवाडा प्रदेश तत्कालीन हैदराबाद संस्थानात समाविष्ट करण्यात आला होता.

हे ही वाचा : जुनं वैर… नवी मैत्री! चंद्रबाबू नायडूंच्या अटकेचा मेसेज काय? वाचा राजकीय Inside Story

मराठ्यांमध्ये जमीनदार आणि शेतकरी सोडून इतर लोकांचा समावेश होतो. महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या 33 टक्के असल्याचा अंदाज आहे.मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली समाज मानला जातो. 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 20 पैकी 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मराठाच आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp