Manoj Jarange : जरांगेंच्या आरोपावर शेलार स्पष्टच बोलले, 'देवेंद्र फडणवीसांनी टिकणारे आरक्षण...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
maratha resevation ashish shelar reaction on manoj jarange allegation on devendra fadnavis maharashtra politics
social share
google news

Ashish shelar Reaction On Manoj Jarange Allegation, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका करायला सुरूवात केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आता जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर लावलेले बिनबुडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. (maratha resevation ashish shelar reaction on manoj jarange allegation on devendra fadnavis maharashtra politics) 

आशिष शेलार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी जरांगेंच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर असे बिनबुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.  

हे ही वाचा : Video : Rohit sharma ने मैदानातच सरफराझला झापलं,' 'ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं''

 मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांशी जी शपथ घेतली त्याप्रमाणे आता 10 टक्के आरक्षण दिले आहे.  समाजाचे अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतून सोडवले जाऊ शकतात आणि सोडवले पाहिजेत, असे देखील आशिष शेलारांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय रंग देणे हे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारण विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतो आहे. आणि म्हणून याबाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे, असे शेलार म्हणालेत.  

देवेंद्र फडणवीस यांचा ऐकेरी उल्लेख झाला त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलले पाहिजे, देवेंद्र  फडणवीसांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठे गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारा नाही. संविधान आणि कायदा याच्या पलीकडे कधी ते बोलतच नाहीत.  म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे करण्यात आलेले बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो, असे देखील आशिष शेलारांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange : फडणवीसांना जरांगेचं खुल्लं चॅलेंज

मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षाने खेळावं, कोणत्याही राजकीय पक्षाने हा प्रयत्न करू नये की, अशा पद्धतीने समाजामध्ये वितृष्ठ निर्माण होईल, आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली ? याचा विचार मराठा समाज नक्की करतो आहे. 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत टिकणार आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलं, ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर आणि उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर 10 टक्क्याचा आरक्षण दिले, तसेच गृहमंत्री म्हणून सुद्धा आपली जबाबदारी योग्य पध्दतीने बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. आम्ही ते फेटाळतो,असे शेलारांनी सांगितले. तसेच जर यात कोणी राजकारण करू पाहत असेल, तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत, अशा इशारा देखील आशिष शेलारांनी विरोधकांना दिला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT