MOTN : मोदींची गॅरंटी 'या' राज्यांमध्ये फेल; भाजपचं वाढणार टेन्शन?

भागवत हिरेकर

Mood of The Nation 2024 South India : लोकसभेच्या 129 जागांपैकी 84 जागांवर भाजपची नजर आहे. कर्नाटकात २५, तेलंगणात १०, केरळात ५ लोकसभा मतदारसंघात भाजपने ताकद लावली आहे.

ADVERTISEMENT

mood of the nation 2024 : There are a total of 129 Lok Sabha seats in the five states of South India.
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ ही पाच राज्ये दक्षिणेत येतात. पाच राज्यात मिळून लोकसभेच्या १२९ जागा आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ

point

पाच राज्यात मिळून लोकसभेच्या १२९ जागा

point

तेलंगणातील 17 जागांपैकी 10 जागा इंडिया आघाडी जिंकू शकते.

Mood Of the Nation Opinion Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया टुडे- सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलचे आकडे समोर आले आहे. देशात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार येताना दिसत आहे. असे असले तरी उत्तरेत प्रत्यक्ष निकालात भाजपच्या जागा घडल्या, तर भाजपचं टेन्शन वाढू शकतं. कारण, भाजपकडून ज्या राज्यांमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तिथे मोदींची गॅरंटी फेल ठरल्याचे या पोलमधून दिसत आहे. (Narendra Modi's popularity in the South Indian state still does not seem to be helping the BJP.)

उत्तर प्रदेशसह उत्तरेतील राज्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडे सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलेले अंदाज भाजपला दिलासा देणार आहेत. पण, ज्या दक्षिण भारताकडे भाजपने लक्ष्य केंद्रीत केलं आहे, तिथे यावेळी अपयश येण्याची शक्यता आहे. 

Lok Sabha 2024 Election : दक्षिण भाजप भाजपसाठी का महत्त्वाचा?

दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये येतात. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या 129 जागा आहेत. अलिकडेच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले की, भाजपची ताकद आहे, ती उत्तर भारतात. पण, उत्तर भारतावर विसंबून तिसऱ्यांदा सत्तेत येता येईल, या भरवशावर भाजप नाही, असेच दिसत आहे. नरेंद्र मोदींचे दाक्षिणात्य राज्यातील दौरे हेच सांगताहेत. 

129 जागांपैकी 84 जागांवर भाजपची नजर आहे. कर्नाटकात 25, तेलंगणात 10, केरळात 5 लोकसभा मतदारसंघात भाजपने ताकद लावलेली आहे. भाजपने देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर 2014 मध्ये 400 पेक्षा जास्त जागा आणि 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे लक्ष्य आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp