Eknath Shinde: '..त्यावर माझं भवितव्य अवलंबून आहे', CM शिंदे कोल्हापुरात असं का बोलले?
CM Eknath Shinde Shiv Sena: शिवसेनेच्या कोल्हापूरमधील महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत चांगला विजय मिळविण्यावर आपलं भवितव्य ठरणार असल्याचं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Kohlapur: कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (my future will depend on getting a good victory in the upcoming lok sabha elections why did cm eknath shinde say this in kolhapur)
'लोकसभा निवडणुका या आपल्या पक्षाच्या पहिल्या निवडणुका आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपल्याला आघाडी मिळाली पाहिजे. याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. माझंही आणि तुमचंही.. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा..' असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.
एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री केल्यापासून भाजपमध्ये बरीच धुसफूस सुरू आहे. त्यामुळेच जर लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा परफॉरमन्स चांगला नसेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवूनच एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
'...याच्यावरच माझं भवितव्य ठरणार आहे'
'निवडणुका आल्या.. अनेक लोकांनी त्यावर भाष्य केलेलं आहे. निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच लागेल.. या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. लोकसभा ही पहिली निवडणूक आपल्या पक्षाची आहे. या निवडणुकीत निवडणूक याद्यावर लक्ष ठेवा.. शिवसेना वाढवत असताना शाखांचं जाळं निर्माण करा.. गाव तिथे शाखा काढा.. गावाच्या वेशीवर शिवसेनेचा फलक लावा.. घर तिथे शिवसैनिक करा..'