कोण आहेत पार्थ पवार? त्यांच्यासाठी अजित पवारांचे पुढचं पाऊल असेल?

ADVERTISEMENT

Ajit pawr parth pawar
Ajit pawr parth pawar
social share
google news

Ajit Pawar: राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार यांनी शिंदे सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील राजकारण अनेकार्थाने ढवळून निघाले. अजित पवारांच्या या निर्णयामुळे पवार कुटुंबीयांमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. 

शिरूर लोकसभा

पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सुरु झाल्यापासूनच अजित पवार यांच्या सुपुत्राचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा होण्यापाठीमागे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार आपला मुलगा पार्थ यांची उमेदवारी घोषितही करू शकतात अशीही चर्चा आहे. 

मावळ मतदारसंघातून पराभव

याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ते पहिल्यांदाच राजकारणात आपले नशीब आजमावत होते, मात्र त्यावेळी त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते. पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह

पार्थ पवार यांनी महाविकास आघाडीच सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिलेल्या पत्रामुळे चर्चेत आले होते. त्यामध्ये त्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्या सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
 

पवार विरुद्ध पवार

 
1. अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवारांनी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवून चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा केली होती. त्यावेळी शरद पवारांच्या बैठकीवर अजित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून ही बैठक अवैध असल्याचे सांगत अध्यक्ष शरद पवार नसून आपण अध्यक्ष असल्याचे सांगितले होते.

ADVERTISEMENT

2.शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून टीका टीप्पणी केल्यानंतर शरद पवारांनी सांगितले होते की, माझ्या वयाचा काय संबंध येत नाही. मग ते वय 82 असो की 92 असो. ते अजूनही प्रभावीपणे काम करु शकतात.

ADVERTISEMENT

3. राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर आधीच दावा करणाऱ्या अजित पवार गटाच्या विरोधात शरद पवार गट आता निवडणूक आयोगाकडे जाण्याचाही त्यावेळी विचार केला होता, त्याप्रमाणे त्यांनी पाऊलं उचललं होती.

4. शरद पवारांच्य त्या बैठकीनंतर अजित पवारांच्या राजकीय रणनीतीबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष असल्याने त्यांनी नरेंद्र राणे यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती, तर अजित पवार गटाकडून दीपक मानकर यांची पुण्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

5. ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीह त्यावेळी ट्विट केले होते की, दिवस उलटून गेल्यानंतरही असंवैधानिक असलेले सरकार स्थापन झाले असून त्याबद्दल अजूनही कोणाला माहिती नाही. त्यामुळेच अजून त्यांना खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. 

 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यानंतर प्रतिक्रिया देत भाजप हे महाराष्ट्र विरोधी असून त्यांनी आधी शिवसेना फोडली, त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसही फोडण्याचे पाप केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT