Prashant Kishor : भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Prashant Kishore, the founder of Jansuraj, has given an interview to India Today.
Prashant Kishore, the founder of Jansuraj, has given an interview to India Today.
social share
google news

Prashant Kishor Prediction for Lok Sabha Election 2024 : पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध भाजप प्रणित एनडीए आणि काही ठिकाणी प्रादेशिक पक्ष अशी स्थिती सध्या दिसत आहे. निवडणुकीबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

जनसुराजचे सुत्रधार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी भाजपच्या ‘अब की बार 400 पार’च्या घोषणेबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं. तसेच निवडणुकीचे निकाल कसे लागू शकतात, याबद्दलही त्यांचे अंदाज मांडले आहेत.

भाजपच्या ‘अब की बार 400’ नारा किती खरा होईल?

लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची घोषणा भाजपने केली आहे. याबद्दल प्रशांत किशोर म्हणाले, “बघा, हा काही खेळ सुरू नाहीये की, जे बोलू ते होईलच. 400 जागा जिंकणे सोप्पे काम नाहीये. जागा जिंकण्याचा दावा करणे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या रणनीतीचा एक भाग असतो. त्यामुळे त्यांच्या पक्षात वातावरण तयार होते.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आंबेडकरांचे काँग्रेससोबत सूर जुळेना! ‘वंचित’ एका अटीमुळे ‘मविआ’तून बाहेरच

“एकंदरीत सांगायचं तर मानसिकरित्या हा दबाव असतो, जो विरोधी पक्षांवर टाकला जातो. यामुळे विरोधकांचे मनोबल कमी होते. भाजप याच अनुषंगाने काम करत आहे”, असे उत्तर त्यांनी दिले.

2024 मध्ये भाजपचा काय आहे प्लॅन?

प्रशांत किशोर म्हणाले, “आपल्याला कळणार नाही की, भाजपने त्यांच्या प्रचाराची सुरू केली आहे. भाजपचं उत्तर आणि मध्य भारतात वर्चस्व आहे, पण पूर्वेकडे स्थिती कमकुमत आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडे तर त्याची स्थिती नगण्यच आहे.”

ADVERTISEMENT

“आता गेल्या काही दिवसांपासून भाजपचे लक्ष कुठे आहे? निवडणूक नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू आणि केरळचे किती दौरे करताहेत. अमित शाह कशा पद्धतीने तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये पक्ष बांधणी करत आहेत”, असे किशोर यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘या’ महिलेमुळे Kalpana Soren यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली?, असं घडलं तरी काय?

भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना किशोर यांनी विरोधकांची उणीवही दाखवून दिली. “भाजपकडे चांगले निवडणूक कार्यपद्धती आहे आणि ते त्याचा वापर पक्ष जिथे कमकुवत आहे, तिथे करत आहेत. विरोधक त्यांचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये अंतर्गत भांडणात गुंतले आहेत. त्यांना त्यांच्या कमकुवत क्षेत्रांवर लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही”, असे भाष्य प्रशांत किशोर यांनी केले.

२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी असेल?

प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, “एकूणच बघितलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप विरोधकांच्या तुलनेत खूप पुढे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम बघितले, तर झालेले घटनाक्रमही त्यांचं पारडं वरचढ असल्याचं दाखवत आहेत.”

“अयोध्येमधील राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा असो किंवा इंडिया आघाडीचे सुरुवातीचे रणनीतीकार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे भाजपसोबत येणे. या सगळ्यांमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होणार आहे”, असे किशोर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा

प्रशांत किशोर यांनी असंही म्हटलं आहे की, “आता गोष्ट राहिली २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी राहील याची, तर मला वाटतं भाजप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कायम ठेवू शकतं. त्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकते”, अशी भविष्यवाणी किशोर यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT