Raj Thackeray : "शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत", राज ठाकरेंची फटकेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवारांनी निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी बांधली अशी टीका राज ठाकरेंनी केली.
राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
social share
google news

Raj Thackeray Speech in Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी, म्हणत शरद पवारांवर टीकास्त्र डागले. (Raj Thackeray attacks on Sharad Pawar)

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी केली. ते म्हणाले, "मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात जो आनंद मिळतोय, ते तसलं सुख नकोय मला. माझ्या आहे ताकद तेवढी.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही" -राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आधी आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार हेच करत आले आहेत आजपर्यंत. जे जे निवडून येतात, त्यांना बरोबर घेतात. त्यांची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. आता तर झालेच", असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना लक्ष्य केले.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "नाहीतर शिवसेनेची मते भाजपला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?

"या महाराष्ट्रात खऱ्या कुठले पक्ष स्थापन झाले असतील, तर एक पहिला जनसंघ, त्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याच्यातील ९९ टक्के लोकांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता", असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

"शरद पवार-अजित पवार एकत्रच" 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, "ज्या प्रकारचे राजकारण सुरूये... कोण कुठेय, तेच कळत नाही. म्हणजे कुणाचंही नाव घेतलं की विचारावं लागतं की तो कुठेय? त्यादिवशी नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले. ते म्हणाले 'आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक.'

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मराठा उमेदवारांमुळे महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान? 

कुणाचे असे विचारल्यावर तीन जण म्हणाले आम्ही शरद पवारांचे. दोन जण बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे की, ते सगळे आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडे बनवताहेत... मुर्ख बनवताहेत. आपापलं यांचं राजकारण सुरूये आणि महाराष्ट्राची माती होतेय", असेही राज ठाकरे म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT