Nawab Malik : ‘अरे बापरे’… राऊतांनी फडणवीसांना पकडलं कात्रीत, काढली जुनी प्रकरणं
Sanjay Raut on Nawab Malik : नवाब मलिक अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे भाजपवर टीका होत आहे. यातच आता संजय राऊत यांनी भाजपने आरोप केलेल्या नेत्यांची प्रकरणं काढली. नेमकं काय म्हणाले… वाचा
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक अजित पवारांसोबत असल्याचे अखेर स्पष्ट झाले. पण, यामुळे कोंडी झाली ती भाजपची. विरोधकांनी भाजपला कात्रीत पकडलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना सोबत नका, असे सांगितले. पत्रानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी जुनी प्रकरणं काढत फडणवीसांना खिंडीत गाठलं. (Sanjay Raut First Reaction On Devendra Fadnavis letter)
७ डिसेंबर रोजी नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनात दिसले. सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे भाजपला सगळीकडे लक्ष्य करण्यात आलं.
त्यावर ‘सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही. असे आमचे स्पष्ट मत आहे. आमचा या गोष्टीला विरोध आहे”, असं शब्दात फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले.
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेरले
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला. यावरूनच खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केले.