'चाल बदकाची, आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे ते...', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई तक

Uddhav Thackeray criticized Nitesh Rane: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
social share
google news

मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. याचवेळी त्यांनी मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता बोचरी टीका केली आहे. 

'अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा.. म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा.. डोळे कोणासारखे माहीत नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

नितेश राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी काय केली टीका?

'हिंदी सक्तीची.. बसा बोंबलत तुम्ही.. हिंदी सक्तीची होणार.. आम्ही होऊ देणार नाही हे ठरवलेलंच आहे. पण त्यामध्ये झगडत ठेवायचं. बटेंगे तो कटेंगे.. त्यानंतर पुन्हा मराठा-मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू-मुस्लिम आहेच.'

हे ही वाचा>> 'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान

'एक बेडूक ओरडतोच आहे त्यात.. त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा.. म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा.. डोळे कोणासारखे माहीत नाही.' 

'जीव काय, बोलतोस काय.. पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि आमच्यावर बोलतोस.. त्यांना कळू दे पहिले नक्की एक कोण तरी बाप ठरवा.. याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोण तरी ठरवा.. जसं आमची 59 वर्षांची शिवसेना झाली तरी आमचा नेता एकच आहे. भगवा एकच आहे, दैवत एकच आहे.. विचार एकच आहे.' 

'शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली. शेठजींची पालखी वाहण्यासाठी नाही केली. शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली नाही. हे त्या मिंध्याला पहिले जाऊन सांगा.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा>> "अहंकारी लोकांचा फणा 2024 च्या निवडणुकीत जनतेनं ठेचला आणि..", उपमुख्यमंत्री शिंदेचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान!

नितेश राणे काय देणार उत्तर?

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता नितेश राणे नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नितेश राणे हे सातत्याने ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्या पक्षावर टीका करत आले आहेत. अशावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नितेश राणेंना निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमधील टीका-प्रतिटीकेची धार अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp