Irshalwadi Landslide: ‘आपल्याला लाज वाटली पाहिजे..’, इर्शाळवाडीला पोहचताच उद्धव ठाकरे संतापले

राहुल गायकवाड

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर तेथील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेलेल्या उद्धव ठाकरेंनी यंत्रणेबाबत काहीसा संताप व्यक्त केला. अशा घटना घडू नयेत यासाठी काही योजना सुरू करण्याची मागणीही केली आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray, who went to console the families of the victims after the accident in Irshalwadi, expressed some anger about the system. It has also demanded to start some schemes to prevent such incidents from happening.
Uddhav Thackeray, who went to console the families of the victims after the accident in Irshalwadi, expressed some anger about the system. It has also demanded to start some schemes to prevent such incidents from happening.
social share
google news

इर्शाळवाडी: रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshagwadi) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. याच ठिकाणी आज (22 जुलै) शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे इर्शाळवाडीला पोहचले. यावेळी झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी दु:ख तर व्यक्त केलंच पण त्यासोबतच त्यांनी संताप देखील व्यक्त केला. (should feel ashamed got angry shiv sena ubt chief uddhav thackeray as soon as he reached irshalwadi raigad live update maharashtra)

‘आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मतं मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की, सरकार बदलल्यानंतर.. पण दुर्लक्ष न करता आता प्रकारच्या गोष्टींबाबत काम केलं गेलं पाहिजे.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते इर्शाळवाडीला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

पाहा उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला नेमकं काय म्हणाले:

‘दर एक दोन वर्षानंतर अशा दुर्घटना घडतात आणि आपण खडबडून जागे होतो.. कालांतर हे विषय थंडावतात. दुर्दैवाची बाब आहे. मी यात राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी म्हणून सर्वांना लाजिरवाणी गोष्ट आहे. आज देखील महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या आहेत की, ज्या डोंगरकपारीत किंवा डोंगर उतारावर आहे. जिथे कधीही दरडी कोसळू शकतात.’

‘मी स्वत: तळीये गावात गेलो होतो त्यावेळी पाहिलं होतं की, होत्याचं नव्हतं झालेलं. आता सुद्धा या ग्रामस्थांशी बोललो. पण काय बोलू, कसं सांत्वन करु.. आणि त्यांच्यासाठी मी करू तरी काय शकतो. हे नंतर आपण जागे होतो आणि धावपळ केल्यासारखं दाखवतो. त्यापेक्षा माझं मत प्रामाणिकपणाने हेच आहे की, सर्वच पक्षाने याबाबतीत राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे.’

‘आज देखील मला निवेदन देण्यात आलं.. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा आज अनेक लोकं आहेत की, ज्यांना असं जीवन जगावं लागत आहे. याकरिता पहिल्यांदा फक्त इर्शाळवाडीच नाही.. तर आजूबाजूच्या वस्त्या वाडी आहेत त्यांना एकत्र करून एक योजना करायला पाहिजे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp