Big Breaking: CM फडणवीसांच्या नागपुरात दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि जाळपोळ
नागपुरात दोन गटात जोरदार दगडफेक झाली असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. कबरीच्या वादावरून हा हिंसाचार झाला असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. नागपुरातील महल परिसरात जोरदार दगडफेक सुरू असून जाळपोळ देखील करण्यात आहे. या सगळ्या प्रकारामुळे सध्या नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, अद्यापही या परिसरात दगडफेक आणि जाळपोळ सुरू असून हिंसाचार हा आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहे. मात्र, तरीही दोन्ही गटातील लोकं मागे हटण्यास तयार नाहीत.
नागपुरात नेमकं काय घडलं?
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल सारख्या हिंदू संघटना सतत कबर हटवण्याची मागणी करत आहेत. सोमवारी सकाळी नागपुरात त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ मोठे निदर्शने करण्यात आली. निषेधादरम्यान, काही संघटनांनी औरंगजेबाची 'कबर' प्रतीकात्मकपणे जाळली.
यामुळे नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यासमोर मुस्लिम समाजाचे लोक जमले आणि त्यांनी निषेध केला. त्याचवेळी अचानक दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात झाली आणि वातावरण अधिक चिघळू लागलं.










