Maharashtra : अजित पवारांच्या मदतीने भाजप एकनाथ शिंदेंना ठाण्यातच देणार आव्हान?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

ajit pawar faction opened new party office in thane that's why buzzing states that bjp on ajit pawar against Eknath Shinde.
ajit pawar faction opened new party office in thane that's why buzzing states that bjp on ajit pawar against Eknath Shinde.
social share
google news

Ajit Pawar vs eknath shinde : दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचं ठाण्यात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. अजित पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयासमोर पार्टी ऑफिस सुरु केल्यानंतर पहिलंच मोठं पक्ष कार्यालय अजित पवार गटाकडून ठाण्यात उघडण्यात आलं. पण, पक्ष कार्यालय उघडण्यासाठी अजित पवारांनी ठाणेच का निवडलं? यामागे कुठलं कारण आहे?

ठाण्यात पक्ष कार्यालय सुरू करुन खरंतर हे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न झाला आहे. नवीन कार्यालय जितेंद्र आव्हाडांच्या घराजवळ आहे. आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्याचबरोबर त्यांचा ठाण्यात देखील दबदबा आहे. अजित पवारांनी ठाण्यात केवळ कार्यालयच नाही, तर आव्हाडांच्या जवळचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांना देखील सोबत घेतलं आहे. त्यामुळे साहजिकच आव्हाडांना आव्हान उभं करण्यासाठी अजित पवारांना यांची मदत होणार आहे.

ठाणेच्या बाल्लेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग

दुसरीकडे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेची इथे अनेक वर्षांपासून सत्ता आहे. दाखवलं जात नसलं, तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून ठाण्यात आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न होताहेत, असं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?

ठाणे आणि कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाला होता. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याणची जागा भाजप लढवेल, असं म्हंटलं होतं. त्यावरुन बरंच राजकारण झालं होतं. त्यातच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या देखील अनेक बैठका या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वाढल्या होत्या.

मुंबई महापालिकेबरोबरच भाजपला ठाणे महानगरपालिका देखील ताब्यात घ्यायची आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांना देखील आव्हान उभं करायचं आहे. दुसरीकडे अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. जाहीर मुलाखतीमध्ये देखील त्यांनी याबाबत वाच्यता केली होती. त्यातच अजित पवारांना पुणे जिल्हाच्या बाहेर देखील त्यांचा होल्ड वाढवायचा आहे. त्यामुळेच ठाण्यात आपलं वजन वाढवण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

ठाणे महानगरपालिकेत कोणाचं किती बलाबल होतं?

ठाणे महानगरपालिकेत 131 जागा आहेत. त्यापैकी 67 जागा या शिवसेनेने जिंकल्या होत्या. 34 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता. भाजपने 23 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने 3, एमआयएम 2, तर अपक्ष 2 जागांवर निवडून आली होती. शिवसेनेनंतर ठाण्यात राष्ट्रावादीची ताकद अधिक आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मदतीने ठाण्यावर विजय मिळवणं भाजपला शक्य होऊ शकतं.

ADVERTISEMENT

वाचा >> “पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता तर कानशिल लाल केले असते”, आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शिवेसेनेप्रमाणे ही लढाई निवडणूक आयोगाकडे गेली आहे. येत्या काळात जर राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेलं, तर त्याचा फायदा ठाण्यात देखील होण्याची शक्यता आहे. जर महापालिकांच्या निवडणुका या युतीत लढल्या गेल्या, तर अजित पवार जिंकलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Sunil Tatkare: सगळे खासदार बाहेर गेले, पण सुनील तटकरे लोकसभेत एकटेच का बसले?

त्यातच शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकेरेंना सहानभुती मिळत असल्याचे अनेक सर्वेंमधून समोर आल्याने शिंदेंना त्याचा फटका ठाण्यात देखील बसण्याची शक्यता आहे. आता अजित दादा सोबत आल्याने शिंदेंनी बार्गेनिंग पॉवर देखील कमी झाली आहे. अशातच अजित पवार आता त्यांची ताकद ठाण्यात वाढवत आहेत. त्यामुळे येत्या काळात अजित पवार शिंदेंना ठाण्यात आव्हान उभं करतात की युती एकत्र यातून मार्ग काढते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT