Uddhav Thackeray: ‘आमच्याकडचे राज्यपाल कसे मस्ती करायचे, त्यांना..’, मणिपूरवरून जहरी टीका
शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्याचसोबत भगतसिंह कोश्यारी यांना मणिपूरला राज्यपाल म्हणून पाठवावं असा सल्लाही दिला.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Criticized PM Modi on Manipur: ठाणे: मणिपूर (Manipur) हिंसाचार आणि महिलांची केलेली विंटबना या मुद्द्यावरुन अवघ्या देशभरातून मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली जात आहे. यावरुनच शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (29 जुलै) ठाण्यातील (Thane) एका जाहीर कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींवर (PM Modi) अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. एवढंच नव्हे तर यावेळी त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना मणिपूरला पाठवा. असं म्हणत भाजपला जोरदार चिमटा काढला. (uddhav thackeray criticized pm modi on manipur in thane speech. he advised that bhagat singh koshyari should be sent to as a governor)
उद्धव ठाकरेंनी मणिपूरच्या मुद्दयावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवलाच. पण याचवेळी ते असंही म्हणाले की, दोन दिवसांनी पंतप्रधान महाराष्ट्रात येणार असून ते गद्दारांसोबत बसणार आहेत. ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं त्यांचा ते सत्कारही करणार आहेत. अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे. पाहा आपल्या ठाण्यातील भाषणात ठाकरेंनी नेमका कोणाकोणावर निशाणा साधला.
‘आमच्याकडे जे राज्यपाल होते कसे मस्ती करायचे.. पाठवा त्यांना तिकडे’
‘मणिपूर जे जळत आहे तेच आपलं हिंदूराष्ट्र का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा.. हनुमान चालीसा.. असं सुरू होतं. अरे ज्या हनुमानानने एका सीतेसाठी लंकेचं दहन केलं.. सीताहरण झालं म्हणून रामायण झालं. आज तिथे जे सरकार आहे ते काय धृतराष्ट्र आहे?’
हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले
‘आपल्याच देशात मणिपूरमध्ये ज्या दोन महिलांसोबत जे केलं गेलं ते फक्त व्हिडीओ समोर आला म्हणून आपल्याला समजलं. तेथील मुख्यमंत्री म्हणतात की, अशा घटना खूप झाल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. राष्ट्रपती महिला आहेत. त्या देखील आदिवासी आहेत. त्या काय करत आहेत?’