Lok Sabha 2024: मोदी-शाहांशी एकनिष्ठ असलेले कृपाशंकर सिंह आहेत तरी कोण?, BJP च्या पहिल्याच यादीत नाव

रोहित गोळे

Who is Kripashankar Singh: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये कृपाशंकर सिंह यांचीही वर्णी लागली आहे. जाणून घ्या कोण आहेत कृपाशंकर सिंह...

ADVERTISEMENT

कोण आहेत कृपाशंकर सिंह?
कोण आहेत कृपाशंकर सिंह?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहेत कृपाशंकर सिंह

point

कांदे-बटाटे विकणारा ते राजकारणी

point

भाजपकडून मिळवलं लोकसभेचं तिकीट

BJP 1st List and Kripashankar Singh: मुंबई: देशात जेव्हापासून मोदी पर्व सुरू झालं तेव्हापासूनच काळाची पावलं ओळखून काँग्रेस आणि इतर पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपची साथ धरली. त्यापैकी असंच एक नाव म्हणजे कृपाशंकर सिंह. काही वर्षांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कृपाशंकर सिंह यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यानंतर भाजपमधील नेतृत्वाशी कायम एकनिष्ठ राहत कृपाशंकर सिंह यांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली. ज्याचं फळ अखेर आज (2 मार्च) त्यांना मिळालं आहे. होय.. कृपाशंकर सिंह यांना भाजपने थेट उत्तर प्रदेशातून उमेदवारी दिली आहे. (who is kripashankar singh loyal to modi and shah singh got candidature in first list announced by bjp for lok sabha elections 2024)

कधी काळी राज्य गृहमंत्री राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास हा फारच इंटरेस्टिंग राहिला आहे. चला तर जाणून घेऊयात नेमके कोण आहेत कृपाशंकर सिंह.

मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे असलेले कृपाशंकर सिंह हे 2004 च्या काँग्रेस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. कृपाशंकर सिंह हे अगदी सामान्य कुटुंबातून आलेले. पण तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी त्यांनी एका औषध कंपनीत काम केलेलं. तर नंतरच्या काळात त्यांनी बटाटे आणि कांदेही विकले होते. पण नंतरच्या काळात त्यांच्याविरोधात 300 कोटींहून अधिक संपत्ती बेकायदेशीरपणे जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे प्रकरण काहीसं मागे पडलं.

मुंबईत विकले कांदे-बटाटे 

कृपाशंकर सिंह हे 1971 साली जौनपूरहून कामाच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईतील सांताक्रूझ परिसरात झोपडपट्टीत राहणारे कृपाशंकर सिंग हे औषध निर्मिती कंपनीत काम करायचे. या कामाच्या मोबदल्यात त्यांना दिवसाला आठ रुपये मिळत होते. मात्र हा पैसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे इतर वेळात ते रस्त्यावर बटाटे आणि कांदे विकायचे.

हे वाचलं का?

    follow whatsapp