MNS:रस्ते, टोल.. अन् कोकणी माणूस.. राज ठाकरेंनी टार्गेट का बदललं, मनात नेमकं काय?

भाग्यश्री राऊत

Raj Thackeray and Konkan: राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून कोकणाकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. पण या सगळ्या मागचं नेमकं राजकारण काय आहे याविषयी राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest
why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest
social share
google news

Raj Thackeray: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्ड्यांवरून भाजपला (BJP) टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मनसेच्या नेत्यांनी यासाठी नुकतीच जागर यात्रा देखील काढली होती. राज ठाकरेंच्या भाषणानं जागर यात्रेचा समारोप देखील झाला. यावेळीही राज ठाकरेंनी भाजपसह शिवसेनेवर टीका केली. पण, आधी वेगळ्या मुद्द्यांवरून खळखट्याक करणाऱ्या मनसेचं टार्गेट बदललंय का? नाशिक दौरे करणाऱ्या राज ठाकरेंनी कोकण (Konkan) आणि पुण्याची (Pune) वाट का धरली आहे? मुंबई-गोवा महामार्गावरील पदयात्रेमधून राज ठाकरेंना काय साध्य करायचं? हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. (why mns cheif raj thackeray change the target what exactly is in his mind regarding konkan maharashtra politics news latest)

एक काळ असा होता की संपूर्ण नाशिक महापालिका मनसेच्या ताब्यात होती. 2012 ला नाशिक महापालिकेत मनसेकडे 40 जागा होत्या. पण, त्या जागा मनसेला टिकवता आल्या नाही आणि 2017 मध्ये मनसे 40 जागांवरून थेट 5-7 जागांवर आली. त्यामुळेच की काय राज ठाकरे नाशिकला दौरे करायचे. पण, इतक्यात राज ठाकरेंनी कोकण आणि पुण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलेलं दिसतंय.

हे ही वाचा >> CM Shinde Vs Ajit Pawar: अजित पवारांमुळे मुख्यमंत्र्यांचा ‘इगो’ दुखवला? फाईलींचा प्रवासच बदलला…

मनसेनं याआधी टोल-नाक्याच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता. पण, यंदा मात्र राज ठाकरेंनी त्यांचा दौरा कोकणाकडे वळवला असून ते आता मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत.

फक्त बोलतच नाही तर चक्क स्वतःच्या मुलापासून तर मनसेच्या नेत्यांना त्यांनी पायी चालायला लावलं. मनसेची जागर यात्रा नुकतीच पार पडली. यात अमित ठाकरे, नितीन सरदेसाईंपासून मनसेचे 9 नेते मुंबई-गोवा महामार्गावरून पायी चालताना पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या भाषणानं मनसेच्या जागर यात्रेचा समारोप झाला. यावेळी राज ठाकरेंनी भाजप-सेनेच्या आमदार-खासदारांवर टीका केली. आपण त्याच त्या पक्षाच्या लोकांना निवडून देतो असं राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp