Big Breaking: 9 जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय: जयंत पाटील

ऋत्विक भालेकर

अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ झाली आहे. असं असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Politics Update: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा गौप्यस्फोट झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने खलबतं सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पक्ष कार्यालयात पक्षातील काही नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. ज्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपसोबत गेलेल्या अजित पवार किंवा कोणावरही आपण टीका करणार नाही. अजितदादांसोबत मी कधीही वाद घातला नाही आणि घालणार असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे म्हणाले की, 9 जणांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. (swearing in ajit pawar upheaval in ncp supriya sule press conference big statement about ajitdada sharad pawar maharashtra politics update today)

जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा

ज्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यां सर्वांना अपात्र ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. असं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं राजकारण पाहायला मिळणार आहे. 

पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

‘संघर्ष कसा करायचा किंवा त्याचं संधीत कसं रुपांतर करायचं हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. कितीही संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा.. आणि आज पवार साहेबांनी पत्रकारांना दिलेलं उत्तर मला वाटतं कोणालाही उर्जा देणारं आहे. माझ्या स्वत:साठी अर्थातच संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. त्यातून नाउमेद होण्याचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असतो की, ठीक आहे.. हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्यातून नव्या उर्जेने.. नवा मार्ग काढू.. ही घटना वेदना देणारी आहे.’

‘2019 ते 2023 म्हणजे 4 वर्ष झाली.. चार वर्षात थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आली आहे. मला असं वाटतं की, तेवढी राजकीय प्रगल्भता माझ्यात देखील आली आहे. की आपलं व्यावसायिक काम आणि आपली नाती यात गल्लत करायची नाही. त्यामुळे माझ्या मनात दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील. माझ्या मनात दादाबद्दल प्रेमच राहील.’

हे वाचलं का?

    follow whatsapp