Prakash Ambedkar : …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला सोबत घेत नाहीये

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

prakash ambedkar vs sharad pawar : why india alliance not invited to vanchit bahujan aghadi
prakash ambedkar vs sharad pawar : why india alliance not invited to vanchit bahujan aghadi
social share
google news

India Alliance Meeting : PM नरेंद्र मोदींच्या विरोधात देशातील 28 पक्ष एकत्र आले आहेत. या 28 पक्षांची इंडिया नावाची आघाडी अस्तित्वात आली आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप प्रणित एनडीएचा पराभव करण्यासाठी या पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मोदी आणि भाजपच्या विरोधात लढताना मतांचं विभाजन होऊ नये, यासाठी इंडिया आघाडी एकत्रित निवडणुकांना सामोरी जाणार आहे. अशातच एकत्र आलेल्या 28 पक्षांबरोबरच इतर छोटो मोठे पक्ष देखील या आघाडीत सामील व्हावेत असा प्रयत्न आहे.

आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील इंडिया आघाडीत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी इंडियाच्या पत्रकार परिषदेत ‘आम्ही प्रकाश आंबेडकरांना इंडियामध्ये घ्यायला तयार आहोत, त्यांना यायचं आहे का हे विचारावं लागेल?’ असं वक्तव्य केलं होतं. असं असलं तरी वंचित बहुजन आघाडी इंडियामध्ये येण्यास तयार आहे परंतु त्याबाबतचं कुठलंही अधिकृत निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे.

त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला इंडियामध्ये सामिल करुन घेण्यात नेमक्या अडचणी कुठल्या अडचणी आहेत? हा कळीचा मुद्दा आहे आणि तोच आपण समजावून घेऊयात….

जानेवारीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युती झाली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती. असं असलं तरी वंचितला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं नव्हतं. आता मोदींच्या विरोधात आघाडी होत असताना वंचितला अजूनही एकत्र येण्याबाबत निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला वंचित का नकोय?

वंचितची जरी शिवसेनेसोबत युती असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याबाबत फार अनुकूल नाहीये. याची कारणं गेल्या निवडणुकीमध्ये आणि या आधीच्या राजकारणामध्ये दडली आहे. 2019 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र लढल्या. 2019 च्या निवडणुकांमध्ये वंचितने मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन वातावरण निर्माण केलं होतं.

निवडणुकांच्या आधी वंचितने काँग्रेसशी आघाडी करण्याची तयारी दाखवली होती. लोकसभेला काँग्रेस सलग 3 वेळा पराभूत झालेल्या जागा वंचितला द्याव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. परंतु काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांची मागणी मान्य करण्यात आली नाही.

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीवर फोडलं खापर

परिणामी वंचितने एमआयएमसोबत निवडणुक लढवली. 2019 च्या निवडणुकीत वंचितने राज्यात मोठ्या प्रमाणावर मतं घेतली. वंचितच्या पाठिंब्यावर एमआयएमचे इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधून खासदार देखील झाले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी भरघोस मतं घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच वंचित ही भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत होती.

ADVERTISEMENT

तिकडे सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचं खापर आंबेडकरांवर फोडत प्रणिती शिंदे यांनी ‘काही लोकं केवळ निवडणुकीपुरती सोलापूरात येतात’ असं वक्तव्य केलं.

हेही वाचा >> शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?

त्यामुळे काँग्रेसमधील एक गट आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी अनुकूल नाहीये. त्यातच प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचं वैर सर्वश्रुत आहे. प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यामुळे शरद पवार देखील प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये घेण्याबाबत किती सकारात्मक आहेत हा प्रश्न आहे.

जेव्हा जेव्हा जागा वाटपांचा प्रश्न आला तेव्हा, ‘प्रकाश आंबेडकरांची युती ही शिवसेनेसोबत आहे शिवसेना त्याबाबत निर्णय घेईल’ असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यास फारसे इच्छूक नसल्याचं चित्र आहे.

हेही वाचा >> Abdul Karim Telgi : ट्रेनमध्ये विकायचा शेंगदाणे! 30,000 कोटींचा घोटाळा करणारा तेलगी कोण?

2024 च्या निवडणुकांची तयारी प्रकाश आंबेडकरांकडून सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी घेतलेल्या सभांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्यासाठी इंडिया वंचितला सोबत घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT