T20 World Cup मध्ये भारत सेमीफायनलपर्यंतही पोहचणार नाही; कपिल देवची भविष्यवाणी
भारतीय संघाने 2022 च्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. याआधीच सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. यावेळी टीम इंडियाला विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार मानला जात असला तरी 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवचा अंदाज काही वेगळंच सांगत आहे. कपिल देव यांनी भाकीत केले आहे […]
ADVERTISEMENT

भारतीय संघाने 2022 च्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात चांगली केली आहे. याआधीच सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. यावेळी टीम इंडियाला विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार मानला जात असला तरी 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवचा अंदाज काही वेगळंच सांगत आहे.
कपिल देव यांनी भाकीत केले आहे की, यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचले तरी ते खूप मोठे असेल. ते म्हणाले की, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतीय संघ टॉप-4 मध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 30% आहे. हा अंदाज का आहे, याचा खुलासाही कपिल यांनी केला आहे.
सामना जिंकण्यासाठी अष्टपैलू खेळाडू असणे आवश्यक : कपिल
विश्वचषक चॅम्पियन कपिल देव लखनऊमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले, ‘तुम्हाला तुमच्या संघात अष्टपैलू खेळाडूंशिवाय दुसरे काय हवे आहे, जे तुम्हाला केवळ विश्वचषकातच नव्हे तर इतर स्पर्धा किंवा मालिकेतही सामने जिंकून देतात. हार्दिक पांड्यासारखा क्रिकेटपटू भारतासाठी खूप उपयुक्त ठरेल.