T-20 World Cup : …म्हणून तुम्ही आमच्याविरुद्ध जिंकत नाही ! ‘विरु’ने काढला पाकिस्तानला चिमटा

मुंबई तक

टी-२० विश्वचषकात बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत-पाक सामन्याचा ज्वर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांवरही चढलेला आहे. या सामन्याआधी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी माजी खेळाडूंनी भारताला डिवचायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये. यंदा २४ तारखेला दुबईत हा सामना रंगेल. अशा परिस्थितीत भारताच माजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

टी-२० विश्वचषकात बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत-पाक सामन्याचा ज्वर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांवरही चढलेला आहे. या सामन्याआधी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी माजी खेळाडूंनी भारताला डिवचायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये.

यंदा २४ तारखेला दुबईत हा सामना रंगेल. अशा परिस्थितीत भारताच माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने आतापर्यंत पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध एकही सामना का जिंकू शकला नाही याचं कारण सांगितलं आहे.

T-20 World Cup : भारताला हरवायचंय? मग हे कराच…जावेद मियाँदादचा पाकिस्तान संघाला सल्ला

सेहवागच्या म्हणण्यानुसार भारत-पाक सामन्याआधी पाकिस्तानचा संघ हा फक्त मोठी-मोठी विधानं करण्यात व्यस्त असतो. दुसरीकडे भारतीय संघाचं लक्ष हे केवळ आपल्या तयारीवर असतं. याच कारणामुळे भारत प्रत्येकवेळी या सामन्यातला दबाव चांगल्या पद्धतीने हाताळतो.

हे वाचलं का?