फडणवीसांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिलं, अन्… वाचा नेमकं काय घडलं

मुंबई तक

योगेश पांडे, नागपूर: नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर: नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई तत्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलिकडेच रेल्वेमंत्री मुंबईच्या दौर्‍यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना अधिकृतपणे निवेदन देत या नागरिकांची व्यथा मांडली.

यावेळी या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर रेल्वेमंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लगेच दूरध्वनी करून कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. सर्वांच्या कागदपत्रांची पुन्हा नीट पडताळणी करावी आणि तोवर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp