Samruddhi Accident : 24 चिंता पेटताच आक्रोश! उपस्थितांच्या काळजाचं झालं पाणी!

मुंबई तक

रविवारी (2 जुलै) 24 प्रवाशांच्या मृतदेहावर बुलढाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 24 चितांना अग्नी देताच स्मशानभूमी मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने हादरून गेली. यावेळी उपस्थितांच्या काळजाचंही पाणी पाणी झालं.

ADVERTISEMENT

samruddhi mahamarg accident death names, administration do final rituals on dead bodies
samruddhi mahamarg accident death names, administration do final rituals on dead bodies
social share
google news

-जका खान, बुलढाणा

Samruddhi Mahamarg Accident News : आधी जखमी झाले आणि नंतर आगीच्या लोळात होरपळून जीव सोडला. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांच्या या मन सुन्न करणाऱ्या अपघाताने महाराष्ट्राचं ह्रदय पिळवटून गेलं. रविवारी (2 जुलै) 24 प्रवाशांच्या मृतदेहावर बुलढाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 24 चितांना अग्नी देताच स्मशानभूमी मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने हादरून गेली. यावेळी उपस्थितांच्या काळजाचंही पाणी पाणी झालं.

समृद्धी महामार्गावर शनिवारी (1 जुलै) मध्यरात्री 1.32 वाजता टॅव्हल्स बसचा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. अपघात आणि आग लागल्यानंतर उशिरापर्यंत मदत न मिळाल्याने 25 प्रवाशांचे जळून कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही मुश्किल झाले.

सामूहिक अंत्यसंस्काराचा घेतला निर्णय

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 25 प्रवाशी बसला लागलेल्या आगीत पूर्णपणे होरपळले. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेही मुश्किल झाले होते. 11 जणांची ओळख पटली, मात्र इतरांची ओळख पटू शकली नाही. मृतदेह जळालेले असल्याने आणि त्यांना जास्त काळ ठेवणे अवघड असल्याने प्रशासनाने सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp