Maharashtra Weather : मुंबई, पुणे,कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ!
Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील 5 दिवसांमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, विदर्भ, मराठवाड्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र हवामान अंदाज 31 जुलै

मुंबई, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Mumbai, Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (IMD Predicts that Heavy to very Heavy Rainfall in Maharashtra including Mumbai, pune, konkan, west Maharashtra, Vidarbha and marathwada)
दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. गुरुवारीपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात 31 जुलै रोजी कसे हवामान?
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, तसेच विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.
1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.