2 लग्न, दोन्ही पत्नींसोबत एकत्र सुखाचा संसार; दोघी मिळून नवऱ्यासाठी देवाकडे करतात प्रार्थना!

मुंबई तक

Marriage Story News : 2 लग्न, दोन्ही पत्नींसोबत एकत्र सुखाचा संसार; दोघी मिळून नवऱ्यासाठी देवाकडे करतात प्रार्थना!

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2 लग्न, दोन्ही पत्नींसोबत एकत्र सुखाचा संसार

point

दोघी मिळून नवऱ्यासाठी देवाकडे करतात प्रार्थना!

Marriage Story News : आग्रा येथील नगला बिहारी भागात राहणाऱ्या रामबाबू निषादच्या दोन्ही पत्नींनी एकत्रपणे करवा चौथची प्रार्थना केली आहे. दोघींनीही पतीला दिर्घायुष्य मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली. दोघींनी मिळून पूजा केली आणि पतीच्या हातून उपवास सोडला. या अनोख्या कुटुंबाची स्टोरी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सामान्यतः करवा चौथचा सण प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. पण या वेळी आग्रा येथून अशी एक घटना समोर आली की, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. येथे एका पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या दोन पत्नींनी मिळून व्रत ठेवले आणि पूजा केली. उपवास सोडतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच चर्चेचा विषय बनला.

दोन्ही पत्नींनी पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडला

ही अनोखी लव्ह स्टोरी आग्रा येथील एत्माद्दौला भागातील नगला बिहारी क्षेत्रातील आहे. येथील राहिवासी असलेल्या रामबाबू निषादच्या दोन पत्नी, शीला देवी आणि मन्नू देवी, एका घरात सुखाचा संसार करतात. करवा चौथच्या दिवशी दोघींनी मिळून व्रत ठेवले आणि पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडला. स्थानिक लोक या दृश्याला पाहून आश्चर्यचकित झाले, तर सोशल मिडियावर लोक अनोख्या प्रेमाचे उदाहरण मानत आहेत.

हेही वाचा : अनंत तरे कोण होते? ज्यांचं ऐकलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंना होतोय पश्चाताप

पहिल्या लग्नानंतर दुसरी पत्नी

रामबाबू यांचे पहिले लग्न सुमारे दहा वर्षांपूर्वी शीला देवीशी झाले होते, त्यांच्याकडून त्यांना मुलेही आहेत. काही काळानंतर त्यांना मन्नू देवीशी प्रेम झाले. संवादाच्या प्रक्रियेत हे नाते हळूहळू घडले. नंतर दोघींनी मंदिरात विवाह केला. खास गोष्ट म्हणजे, पहिली पत्नी शीला देवीने या नात्याचा विरोध केला नाही, तर मन्नू देवीला खुलेपणाने स्वीकारले. आज दोन्ही स्त्रिया एकमेकांना बहिणीप्रमाणे मानतात आणि एकाच घरात आनंदाने राहतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp