नागपूरमध्ये विवाहितेनं स्वत:ला संपवलं, अवघ्या 14 महिन्यांचा संसार...

मुंबई तक

नागपूरमधील टाकळघाट परिसरात लग्नाला अवघे 14 महिने झाले असताना विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

विवाहितेने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं
विवाहितेने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरात विवाहितेची आत्महत्या

point

अवघ्या 14 महिन्यांचा संसार सुरू असताना केली आत्महत्या

Nagpur News: सध्या, सासरच्या जाचाला कंटाळून राज्यात मोठ्या प्रमाणात विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच नागपूरमधील टाकळघाट परिसरात लग्नाला अवघे 14 महिने झाले असताना विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. घरातील एका लोखंडी व्हेंटिलेटरला ओढणीचा वापर करुन गळफास घेऊन तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. 

दुपारच्या सुमारास घडली घटना

सोमवारी (16 जून) रोजी दुपारच्या सुमारास नागपूरातील टाकळघाटमध्ये एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेतील 21 वर्षीय पीडितेचं नाव चैताली मनोज कामडी असं असून तिच्या लग्नाला अवघे 14 महिने झाले होते. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा केल्यानंतर पीडितेचा मृतदेह नागपूर मधील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हे ही वाचा: अंघोळीला बाथरूममध्ये गेला आणि परतलाच नाही... विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, पालकांनी थेट तोडफोड...

14 महिन्यांचा संसार

16 एप्रिल 2024 रोजी चैताली आणि मनोजचं लग्न झालं होतं. या 14 महिन्यांच्या काळात त्यांचा संसार अगदी सुखात सुरु होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र, या विवाहितेने आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीये. तक्रारीनंतर महिलेचा पती आणि सासू रत्नामाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस निरीक्षक दीपक अग्रवाल यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल मोरे करत आहेत. 

हे ही वाचा: पान-सुपारीच्या 50 रुपयांवरुन वाद, जाब विचारला म्हणून कोयत्यानं... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

तरुणींच्या आत्महत्येच्या प्रकरणात वाढ

ठाण्यातील ऐरोलीमध्ये देखील एका तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव नंदिनी तिवारी असं असून ती मूळ कानपूरची रहिवाशी होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वी ती कामानिमित्त एरोली येथे पीजीमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणी सुट्टीमध्ये गावी गेल्यावर तिने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp