झुडुपांमध्ये कार, आतमध्ये तीन सडलेले मृतदेह, स्थानिक महिलेनं पाहिलं अन् हादरली... शहापूरमधील घटना काय?
उंबरमाली गावातील एक महिला जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेली असता, तिला झुडुपांमध्ये कार दिसली. यावेळी या महिलेला झाडीमध्ये पडलेल्या कारमधून दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शहापूर जवळच्या उंबरमाळी गावातील घटना

महिलेला झुडुपांमध्ये दिसली कार

कारच्या आतमध्ये आढळले तीन सडलेले मृतदेह
Shahapur Car Incident : शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावाजवळ झाडीझुडपांमध्ये एक कार कोसळलेली आढळून आली. या कारमध्ये स्थानिकांना एक दोन नाही, तर तब्बल तीन सडलेले मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. हा अपघात काही दिवसांपूर्वी घडला असावा असा अंदाज लावण्यात आला, पण याची कुणालाही कशी लागली नाही असाही सवाल उपस्थित होतोय.
स्थानिक महिलेला काय दिसलं?
उंबरमाळी गावातील एक महिला जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेली असता, तिला झुडुपांमध्ये कार दिसली. यावेळी या महिलेला झाडीमध्ये पडलेल्या कारमधून दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. जवळ जाऊन पाहताच कारची अवस्था आणि त्यातून येणारा तीव्र वास पाहून ती घाबरली. तिनं तातडीने गावकऱ्यांना बोलावलं आणि कसारा पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा >> पत्नी चिडली अन् वाट लागली.. रात्री अडीच वाजता पतीच्या तोंडावर फेकली 'ती' गोष्ट, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही!
घटनास्थळी पोहोचलेल्या कसारा पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं कारची पाहणी केली असता त्यात तीन सडलेले मृतदेह आढळले. मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर कारच्या नंबरप्लेट आणि कागदपत्रांच्या तपासणीतून ही कार मुंबईच्या अंधेरी खार परिसरातील असल्याचं निष्पन्न झालं.
मृतांमधील एकाची ओळख पटली
मृतांपैकी एकाची ओळख यज्ञेश वाघेला अशी झाली. तर इतर दोन तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतांचं वय 25 ते 30 दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मृतदेहांची अवस्था पाहता, हा अपघात किमान चार ते पाच दिवसांपूर्वी घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कार कदाचित वेगात असताना अनियंत्रित होऊन झाडीझुडपांमध्ये कोसळली आणि कोणाच्याही नजरेस पडली नाही.
हे ही वाचा >> हनिमूनला गेलेल्या कपलसोबत काय घडलं, पतीची हत्या.. पत्नी बेपत्ता; ही मर्डर मिस्ट्री तुमचं डोकंच टाकेल चक्रावून!
पोलिसांनी प्रेतं शवविच्छेदनासाठी पाठवलं असून, अपघाताची सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू केली आहे. हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.