Monsoon Update: पावसाने का घेतला अचानक ब्रेक? 'ही' 2 कारणं महत्त्वाची!

मुंबई तक

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, मान्सूनने ब्रेक घेतलाय का?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. मात्र आता राज्यात अचानक पावसाला ब्रेक लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, पावसाचा जोर कमी होण्यामागे दोन महत्त्वाची हवामानशास्त्रीय कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात पाऊस कमी का होणार?

सध्या संपूर्ण देशात नैऋत्य मान्सून सक्रिय असला तरी त्याला पोषक ठरणाऱ्या हवामान प्रणाली महाराष्ट्रासाठी अनुकूल नाहीत.

1) अरबी समुद्रात पोषक हवामान प्रणाली नाही

हे वाचलं का?