आधी एल निनो, आता टायफून बावी, महाराष्ट्र मान्सूनवर परिणाम होणार?

मुंबई तक

el nino and now typhoon bavi : महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता सध्या कमी होत असून त्यामागे हवामानातील विविध प्रणाली कारणीभूत असल्याचे चित्र आहे. एल निनोनंतर आता प्रशांत महासागरातील टायफून बावीचाही वाऱ्यांच्या दिशेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

el nino and now typhoon bavi
el nino and now typhoon bavi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आधी एल निनो, आता टायफून बावी

point

महाराष्ट्र मान्सूनवर परिणाम होणार?

el nino and now typhoon bavi : महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण घटले असून कोकण आणि मुंबईतील पावसातही काही प्रमाणात घट झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा झारखंड, मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशात पोहोचल्यामुळे उत्तर भारतात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातील प्रणालीची तीव्रता कमी झाल्याने महाराष्ट्राकडे येणारी आर्द्रताही घटली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगांचे प्रमाण कमी झाले असून पावसाची शक्यता मर्यादित राहिली आहे. कोकण किनारपट्टी, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात काही प्रमाणात आर्द्रता असल्याने हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तर विदर्भात मध्य प्रदेशातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली नाही.

हेही वाचा : आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!

प्रशांत महासागरात तयार झालेल्या टायफून बावीची चर्चा

दरम्यान, प्रशांत महासागरात तयार झालेल्या टायफून बावीचीही चर्चा सुरू आहे. हे टायफून फिलिपीन्सजवळ असून ते चीनच्या दिशेने सरकत आहे. त्याची व्याप्ती सुमारे एक हजार किलोमीटर इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या टायफूनचा थेट परिणाम भारतावर होणार नसला तरी नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांवर त्याचा काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. टायफूनच्या तीव्रतेमुळे आसपासच्या हवामान प्रणालींमध्ये बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरातील वारे खेचले जाणे, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणे आणि हवामानातील वाऱ्यांच्या दिशांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्द्रतेचे वितरण बदलू शकते, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : Personal Finance: दरमहा 2 हजार गुंतवा आणि 42 हजार परत मिळवा, लखपती बनण्याचा फॉर्म्युला!

हे वाचलं का?