Election Commission: अजित पवारांचं मोठं पाऊल, सुरू केली तयारी
अजित पवारांनी बंड करत ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले.
ADVERTISEMENT
![Election Commission: अजित पवारांचं मोठं पाऊल, सुरू केली तयारी Ajit Pawar faction will approach to election commission for claim on ncp.](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/mumbaitak/images/story/202307/marathi_latest_news-2023-07-05t103910.102-600x338.png?size=948:533)
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी शिवसेना मिळवल्यानंतर अजित पवारांनीही त्याच मार्गावरून वाटचाल सुरू केली आहे. आम्हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा करणाऱ्या अजित पवारांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तयारीत जाण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील बैठकीवेळीच अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र घेतली जात आहे.
अजित पवारांनी बंड करत ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले. आता दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात असून, मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांच्या गटाने बैठक आयोजित केली आहे, तर दुसरीकडे वांद्रे येथील एमईटी सभागृहात अजित पवारांच्या गटाने बैठकीचे आयोजन केले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
रस्त्यावरची लढाई आता निवडणूक आयोगात
या दोन्ही बैठकांमध्ये शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे. एकीकडे दोन्ही गटाकडून रस्त्यावरची लढाई लढली जात असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीच्या फुटीचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. बैठकीनंतर अजित पवारांचा गट निवडणूक आयोगामध्ये धाव घेणार आहे.
वाचा >> “दिल्लीवाल्यांची लाथ व फडणवीसांचा बुक्का”, एकनाथ शिंदेंवर ‘ठाकरें’चा हल्ला
दुसरीकडे शरद पवारांच्या गटाने देखील त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय़ देऊ नये अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या गटाने मागवली शपथपत्रं
अजित पवार गटाची बैठक ज्या ठिकाणी होत आहे, तिथे नोंदणी स्टॉल तयार करण्यात आले आहेत. इथे विविध जिल्ह्यांतून आलेल्या जिल्हाध्यक्षांसह पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे भरून घेण्यात येत आहे. शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर ही ही शपथपत्रे भरून घेतली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा घेण्याची तयारी अजित पवारांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> NCP: ‘ज्यांच्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली, तेच आता..’, जयंत पाटलांनी चिमटाच काढला!
त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादी कोणाची हा फैसला निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे.
शिवसेनेच्या बंडानंतर पक्ष कोणाला हा वाद निवडणुक आयोगात गेला होता. निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्ष चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना दिलं. तेच आता राष्ट्रवादीत होत आहे.
ADVERTISEMENT