आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीस जाणाऱ्या श्री सदस्यांच्या घरी कशी केली जाते अधिष्ठानाची स्थापना. बैठकीतील अधिष्ठान म्हणजे नेमकं काय.. जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यानंतर सरकार आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या दोन्हींवर अनेकांनी टीका केली. याच सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) आणि त्यांची श्री समर्थ बैठक या गोष्टी चर्चेत आल्या. श्री समर्थ बैठक म्हणजे काय?, इथे नेमकी काय शिकवण दिली जाते हे आपण याआधी पाहिलंच आहे. आता आपण जाणून घेऊयात की, ज्या अधिष्ठानाला सर्वश्रेष्ठ मानून श्री समर्थ बैठक चालते ते अधिष्ठान नेमकं काय आणि ते श्री सदस्यांच्या घरी नेमकं येतं कसं? याचबाबत या लेखातून आपण जाणून घेऊया. (what is appasaheb dharmadhikaris shree samarth baithak and adhisthana how do shre sevak get this)
महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठकीची सुरुवात केली. दासबोधचं चिंतन करुन नानासाहेबांनी आपल्या निरुपणांना सुरुवात केली. ज्याद्वारे त्यांनी संत साहित्याचा प्रसार केला. तसेच सामाजिक मूल्य कशाप्रकारे जपली जावीत यावरही भाष्य केलं.
मात्र, असं असलं तरीही नानासाहेब धर्माधिकारी यांना या गोष्टीची जाणीव होती की, फक्त निरुपणाने लोक त्यांच्या परमार्थ मार्गाकडे वळणार नाहीत. तर त्यासाठी एखाद्या अधिष्ठानाची देखील गरज आहे.
हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
त्यामुळेच जेव्हापासून धर्माधिकारींनी समर्थ बैठकीला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी एकमुखी दत्त असलेल्या अधिष्ठानाची स्थापना केली. याच अधिष्ठानाची नंतर श्री सदस्यांच्या घरी देखील स्थापना केली जाऊ लागली. हे अधिष्ठान म्हणजे कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेले एकमुखी दत्त यांचा एक फोटो असतो.