नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का.. तेही आप्पासाहेबांच्याच घरातील?

मुंबई तक

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील चारच ट्रस्टी का आहेत असे सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

why only 4 trustees in nanasaheb dharmadhikari foundation that too from appasahebs own family
why only 4 trustees in nanasaheb dharmadhikari foundation that too from appasahebs own family
social share
google news

मुंबई: खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सोहळ्याला गालबोट तर लागलंच पण याच बरोबर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्याबाबत देखील काही सवाल उपस्थित केले जाऊ लागले. आप्पासाहेब धर्माधिकारी चालवत असलेली श्री समर्थ बैठक म्हणजे काय?, तिथे काय शिकवण मिळते? यासारखे अनेक प्रश्न आतापर्यंत विचारले जात आहेत. पण असं असताना आता नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानबाबतही काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का? ते देखील आप्पासाहेब यांच्यासह त्यांच्याच घरातील चारच जणं का? याच प्रश्नांच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न ‘मुंबई Tak’ने केला आहे. (why only 4 trustees in nanasaheb dharmadhikari foundation that too from appasahebs own famil)

सगळ्यात आधी आपण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेमकं काय आणि त्यांची कार्यकक्षा कशा स्वरुपाची आहे हे आधी जाणून घेऊया.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेमकं काय?

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही साधारण 2010 साली सुरु झाली होती. मात्र, 2014 ला तिला अधिकृत मान्यता मिळाली. धर्माधिकारी कुटुंब हे मागील अनेक वर्षांपासून श्री समर्थ बैठक चालवत आहेत. यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही ते आणि श्री सदस्य हे सहभागी होत असत. मात्र, याला कोणत्याही प्रकारची योग्य अशी रचना किंवा मांडणी नव्हती. म्हणूनच सामाजिक कामांसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. श्री सदस्यांची समाजाभिमुख कामांसाठी उपयोग व्हावा हा या प्रतिष्ठानचा मूळ उद्देश आहे. याच जाणीवेतून त्या प्रकारची कामं ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जातात.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेमकी काय-काय कामं होतात?

सामाजिक कामांसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तशाच स्वरुपांची कामं ही केली जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि उद्योग यांच्याशी संबंधित अशी कामे केली जातात.

हे वाचलं का?

    follow whatsapp