बायकोने रिक्षाचालक नवऱ्याला संपवले, कारण वाचून बसेल धक्का

मुंबई तक

प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चालक नवऱ्याची त्याच्या पत्नीने क्रूरपणे हत्या केली. आंध्र प्रदेशातील या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोने रिक्षाचालक नवऱ्याला संपवले

point

कारण वाचून बसेल धक्का

Crime News : आंध्र प्रदेशमध्ये एका महिलेने तिच्या 38 वर्षीय पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला हृदयरोगाचा त्रास होता, मात्र आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने त्याचा काटा काढला. संशय टाळण्यासाठी या महिलेने आणि तिच्या प्रियकराने पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला होता. पतीला आधीच हृदयाचा आजार असल्यामुळे त्यांच्या या डावावर सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इन्स्टाग्रामवरुन जुळले प्रेमसंबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामादेवी आणि तिचा प्रियकर प्रसादम् गोपीसाई यांनी काकिनाडा येथील ऑटो चालक असलेल्या पुल्ला दुर्गा प्रसाद यांच्या हत्येचा कट रचला होता. रामादेवी आणि गोपीसाईची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती, ज्याचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. या दोघांनी मार्च महिन्यात दुर्गा प्रसाद यांच्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि ते बेशुद्ध झाल्यानंतर श्वास कोंडून त्यांची हत्या केली.

हे ही वाचा : सुप्रिया सुळे यांचे जावई आहेत तरी कोण? पक्षीय बंधन तोडून रेवती सुळे थाटणार संसार

कुणालाही आली नाही शंका

दुर्गा प्रसाद यांचा मृत्यू 13 मार्च रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुर्गा प्रसाद यांच्यावर यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांना हृदयविकाराचा इतिहास असल्यामुळे नातेवाईकांनीही ही नैसर्गिक घटना मानून मृतदेह स्वीकारला. यामुळे अनेक महिने हा गुन्हा लपून राहिला आणि कोणालाही घातपाताचा संशय आला नाही.

हे ही वाचा : पार्थ पवारांसोबत एन्ट्री, सर्वांच्या नजरा खिळल्या, कोण आहेत कायनात धार?

हत्येचा कट उघडकीस

मात्र, काही महिन्यांनंतर या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला. पीडित कुटुंबाला या घटनेचा संपूर्ण तपशील असलेला एक मेसेज मिळाला, ज्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. या मेसेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता रामादेवी आणि गोपीसाई यांचे प्रेमप्रकरण आणि त्यांनी रचलेला हत्येचा कट उघडकीस आला. पोलिसांनी सखोल चौकशीअंती या दोन्ही आरोपींना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

हे वाचलं का?